Wardha, 28 July : आदिवासी समाजाच्या बैठकीत जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी ‘खात्याला मूर्ख मंत्री भेटलाय...चुXXX निव्वळ....चोर साला...’ असे विधान केले होते. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सोनवणेंचा समाचार घेतला होता. त्यावर आता आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमदार शरद सोनवणे यांना एकदा बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे. पण, माणूस चांगला आहे,’ असे मंत्री उईके यांनी म्हटले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून वर्ध्यात विदर्भ स्तरावरील विचार मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या बैठकीला आलेले आदिवासी विकास मंत्री अशोक उईके (Ashok Uike) यांनी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या त्या विधानावर संयत प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्री उईके म्हणाले, आमदार शरद सोनवणे (Sharad Sonawane) हे चुकले असतील. पण, त्यांचा उद्देश तसा नसू शकतो. चांगला माणूस आणि आमदार आहे. ते जुन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. त्या मतदारसंघात मी जाऊन आलो. या मतदारसंघात आदिवासी समाजाची संख्या मोठी आहे, त्यामुळे आमदार सोनवणे यांच्यासोबत आमच्या दोन ते तीन बैठकाही झाल्या आहेत. त्यांच्याकडून अनावधनाने ते बोललं गेलं असेल. पण आमदार चांगला आहे, त्यामुळे ते द्वेषापोटी बोलले नाहीत, एवढं मात्र निश्चित.
जुन्नर विधसानसभा मतदारसंघात मी एकदा जाऊन आलो आहे, तो चांगला आमदार आहे. आमदार शरद सोनवणे यांना एकदा बोलावून घेणार आहे. त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहे. पण, माणूस चांगला आहे. अचानक त्यांची जीभ घसरली असेल पण आमदार चांगला आहे. चांगले बोलतो आणि आमचे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत, असेही उईके यांनी स्पष्ट केले.
सुधीर मुनगंटीवार यांची बैठकीला दांडी
वर्धा येथील भाजपच्या बैठकीला आमदार सुधीर मुनगंटीवार अनुपस्थित राहिले आहेत, त्याबाबत उईके म्हणाले की, कोण आलं आणि कोण नाही, याबाबत मला माहिती नाही. चंद्रपूरची टीम भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यक्रमाला येईल.
शरद सोनवणे यांनी काय म्हटले होते?
खात्याला मूर्ख मंत्री भेटलाय...चुXXX निव्वळ....चोर साला...बघतो आता मुख्यमंत्र्यांसमोर उभं करणार आहे. ह्यांचीही (घोडेगाव आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी) पण चांगलीच नीट करणार आहे. आम्ही काय कोणाला बांधील आहे का? या शरद सोनवणेने किती अधिकाऱ्यांना भिकेला लावले आहे, हे यांना माहिती आहे. जनता महत्वाची आहे, अधिकारी नाही. अधिकारी राहील, नाही राहिल. पण जनता महत्वाची आहे, अशी विधाने आमदार शरद सोनवणे यांनी केली होते.
अजित पवार काय म्हणाले होते?
सत्ताधारी आमदार शरद सोनवणे यांनी केलेल्या विधानाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली. ते म्हणाले, हे महाराष्ट्राच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे का? मी कायम हेच सांगतोय. विकासबाबत मी सकाळपासून बोलतोय, ते दिलं सोडून आणि आमक्याने असं म्हटलं विचारता. काही काही लोक विकृत असतात. त्यांना प्रत्येकाला उत्तर देत बसलो तर मला दिवस पुरायचा नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.