Prakash Ambedkar On India Allience  Sarkarnama
विदर्भ

Prakash Ambedkar On India Alliance : राजकारणात आम्हाला अस्पृश्यतेची वागणूक; प्रकाश आंबेडकरांची खंत‍ !

Chetan Zadpe

Akola News : राजकारणातही आपल्याला आता अस्पृश्यतेची वागणूक मिळत असल्याचा संताप वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. ट्विटरवरील एका पोस्टच्या माध्यमातून अॅड. आंबेडकर यांनी भाजपासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका केली आहे. (Latest Marathi News)

"भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भारतीय राजकारणावर प्रभाव वाढला आहे. तेव्हापासून सनातन धर्म मानणारे आणि त्याचे प्रचारक असणारे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही राजकारणातही अस्पृश्यता पाळायला लागले आहेत," असे आंबेडकर म्हणाले. वंचित बहुजन आघाडीला 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत निमंत्रण द्यायला ती काही सत्यनारायणाची पूजा थोडीच होती, असे वक्तव्य महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले होते. वडेट्टीवार यांच्या या वक्तव्याचाही आंबेडकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

'इंडिया' आघाडीत येण्यासाठी जर कोणालाही निमंत्रणाची गरज नव्हती तर काँग्रेस इतर पक्षांना निमंत्रण वाटत का फिरत होती, असा सवालही आंबेडकर यांनी उपस्थित केला. लालू प्रसाद यादव आणि स्टॅलिन या जातीव्यवस्थेच्या निकषानुसार शूद्र असलेल्या मोठ्या समाजवादी नेत्यांशिवाय तुमच्या आघाडीची गाडी अडली नसती तर त्यांना तुम्ही निमंत्रण दिले असते का? याबद्दल मला शंकाच आहे, असेही आंबेडकर यांनी नमूद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT