Jitendra Awhad
Jitendra Awhad Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad : आव्हाडांचा कानाला खडा; 'त्या' प्रकरणानंतर नाकारलं एकनाथ शिंदेंचं आमंत्रण

सरकारनामा ब्युरो

Jitendra Awhad: काही दिवसांपुर्वी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमादरम्यान. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. त्यामुळे मोठा राडाही झाल्याचे संपुर्ण महाराष्ट्राने पाहिले. आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल झाला होता. त्यामुळे त्यांना एक रात्र तुरुंगातही काढावी लागली होती. पण आता आव्हाड चांगलेच सावध झाल्याचे पाहिला मिळत आहेत.

ठाणे महापालिकेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काही योजनांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी जितेंद्र आव्हाड यांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र यावेळेस कार्यक्रमाला जाणार नसल्याचं जितेंद्र आव्हाड यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ट्विट करत त्यांनी माहिती दिली आहे. ट्विट करताना त्यांनी एकनाथ शिंदे यांना नाव न घेता टोलाही लगावला आहे.

''आज ठाणे महापालिकेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही योजनांचे शुभारंभ आहे आमंत्रण दिले महापालिकेनी पण ब्रिज च्या उद्घाटनात त्यांच्या ८ फूट अंतरावर माझ्यावर ३५४ चा गुन्हा दाखल झाला ते स्वतः साक्षीदार आहेत. आज त्यांच्या बाजुला उभा राहीन आणि पोलिस पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील … त्या पेक्षा कार्येक्रमाला न गेलेले बर परत पोलिस म्हणतील दबाव होता आणि सीएम म्हणतील तुला माहीत आहेना मी हे करू शकत नाही .. तुला कस कळत नाही … खरच कळत नाही ….. चलो ये वक्त भी गुजर जयेगा …… u too brutas'' असं ट्विट त्यांनी केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT