Ajit Pawar, Devendra Fadnavis,  Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar Passed Away : 'दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला...', अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis On Ajit Pawar Death : 'अजित दादा एक संघर्षशील नेतृत्व होतं. सर्व परिस्थितीमध्ये न डगमगता पुढं जाणारं नेतृत्व होतं. आजच दिवस कठीण आहे कारण अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक दिवस लागतात. ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान ते देत होते.'

Jagdish Patil

Mumbai News, 28 Jan : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) अध्यक्ष अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या निधनानंतर देशभरातील दिग्गज नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या अजित पवारांबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "आज सकाळी अतिशय दु:खद घटना घडली.

अनाकलनीय परिस्थितीमध्ये विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दु:खद निधन झाल्याची वार्ता मिळाली आणि राज्यात शोककळा पसरली. महाराष्ट्रातले एक लोकनेते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती आणि लोकांच्या प्रश्नांची जान असलेले ते नेते होते. त्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये मोठी आस्था होती.

अजित दादा एक संघर्षशील नेतृत्व होतं. सर्व परिस्थितीमध्ये न डगमगता पुढं जाणारं नेतृत्व होतं. आजच दिवस कठीण आहे कारण अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक दिवस लागतात. ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान ते देत होते. अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं अविश्वसनीय आणि मनाला चटका लावणारं आहे.

माझ्यासाठी दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेलेला आहे, अशा शब्दात फडणवीसांनी अजितदादांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, यावेळी त्यांनी मी आणि एकनाथ शिंदे लवकरच बारामतीत निघणार असल्याची माहिती दिली. शिवाय मी सकाळपासून सर्वांच्या संपर्कात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनाही घडलेल्या परिस्थितीची कल्पना दिली असून त्यांनीही दुख व्यक्त केलं आहे.

देशातच या प्रकरणामुळे हळहळ पसरली आहे. पुढच्या सगळ्या गोष्टी पवार परिवाराशी चर्चा करून ठरवण्यात येतील. सकाळी सुप्रियाताईंशी आणि पार्थ पवारांशी बोलणं झालं. सगळे बारामतीत पोहोचल्यानंतर सगळ्या गोष्टींचे निर्णय त्यांच्या संमतीने घेतले जातील, असंही फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं. त्याचवेळी त्यांनी आज शासकीय सुट्टी घोषीत केल्याचं आणि राज्यात तीन दिवसांचा दुखवटा देखील जाहीर केल्याचं सांगितलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT