Ajit Pawar, Nitin Gadkari
Ajit Pawar, Nitin Gadkari sarkarnama
मुंबई

गडकरी म्हणाले, राजकारण सोडावे वाटते; अजितदादा म्हणतात ते तर सत्ताधारी पक्षात...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजप (BJP) नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी राजकारणातून संन्यास घ्यावासा वाटत, असल्याचे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. आपण राजकारण कधी सोडतोय असे वाटू लागल्या आहे, असे गडकरी यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात म्हणाले. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर भाष्य केले.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. मंत्री म्हणून ते लोकप्रिय आहेत. त्यांचा अनुभव मोठा आहे. सत्ताधारी पक्षात असतानाही त्यांच्या मनात अशी भावना येते, ही राज्याच्या देशाच्या जनतेने विचार करण्याची बाब आहे, असे पवार म्हणाले.

नितीन गडकरी काय म्हणाले होते?

राजकारण शब्दाचा अर्थ समजून घेण्याची वेळ आली आहे. राजकारण हे समाजकारण आहे, राष्ट्रकारण आहे, विकासकारण आहे, की सत्ताकारण हे समजून घेतले पाहिजे. महात्मा गांधींपासून ज्या राजकीय परंपरेने कार्य झाले त्यामध्ये राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होते. मात्र, आता १०० टक्के सत्ताकारण झाले आहे.

मला अनेकदा राजकारण सोडावे असे वाटते, कारण आयुष्यात राजकारण सोडता अनेक गोष्टी करण्यासारख्या आहे, अशी भावना गडकरी यांनी व्यक्त केली होती. माणसाच्या मोठेपणाचा, कर्तृत्वाचा, गुणवत्तेचा त्याच्या निवडून येण्याच्या गुणवत्तेशी काही संबंध नाही. जो निवडून येतो तोच सिकंदर अशी समाजात भावना आहे. निवडून येणाऱ्या लोकांबद्दल फार काही बोलायचे नाही. वेगवेगळ्या प्रकारचे लोक निवडून येत असतात,, राजकारणात व क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते असे ही गडकरी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT