Ajit Pawar News : आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत आमदार-खासदार, लोकप्रतिनिधी यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत अजित पवारांनी मार्गदर्शन केले. मागील काही काळापासून हिंदुत्ववादी भूमिका घेत मुस्लिम समुदायाविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार संग्राम जगताप हे देखील या बैठकीला हजर होते.
'राज्यात सध्या सामाजिक पातळीवर अनेक घटना घडत आहेत, अश्या वेळी सार्वजनिक जीवनात आपण एखाद्या समुदायाबद्दल अथवा जाती-जमाती बद्दल काय बोलतो आहोत, त्याचे काय परिणाम गाव -खेड्यात उमटू शकतात याची जाणीव सर्वच जबाबदार नेत्यांनी ठेवणं आवश्यक आहे.', असे अजित पवार म्हणाले.
संग्राम जगताप यांना मुस्लिम समाजाने विधानसभेत मत दिली नाहीत त्यामुळे ते मुस्लिम विरोधी भूमिका घेत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, या बैठकीत अजित पवार म्हणाले, निवडणुकीत एखाद्या समुदायाने मत दिली नाहीत म्हणून जर आपण पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात भूमिका घेत असू तर ते योग्य नाही, याची पक्ष दखल घेत आहे याची जाणीव असू द्या.'
'प्रत्येक निवडणुकीत एखादा समाज घटक आपल्या सोबतच राहतो असं नसत, एका निवडणुकीत त्यांनी मत दिली नाहीत म्हणजे ते आपले शत्रू झालेत असा त्याचा अर्थ होत नाही, याचं भान असू द्या.', असे देखील त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शेतकऱ्यांची मूल आहेत. आपला बाज ग्रामीण आहे. एकाद्या विधानाचा पुढचा मागचा संदर्भ न देता माध्यम चुकीच चित्र रंगवतात. मात्र, याचा परिणाम पक्षाच्या प्रतिमेवर होऊ शकतो. त्यामुळे काय बोलतो याचे भान ठेवा. काही जण जाणीवपूर्वक प्रक्षोभक आणि भावना दुखवणारी वक्तव्य करतात. मात्र, यापुढे या गोष्टींना मी वेगळ्या प्रकारे घेईल, असे म्हणत अजित पवारांनी अप्रत्यक्ष संग्राम जगतापांना इशारा दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.