Ajit Pawar News, Political Crisis in Maharashtra 
मुंबई

Ajit Pawar : अजित पवार म्हणतात, मुख्यमंत्रीच शिवसेनेचा तर सरकार अल्पमतात कसं?

Eknath Shinde news|Ajit Pawar| Mahavikas Aghadi| राष्ट्रवादी कॉंग्रेस मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभी राहणार.

सरकारनामा ब्युरो

मुंबई: ''राष्ट्रवादी कॉंग्रेस मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. सरकार टिकवण्यासाठी त्यांना जी काही मदत करता येईल ती सर्व मदत राष्ट्रवादीकडून (NCP) केली जाईल. त्यासाठी आज आम्ही मुख्यमंंत्र्यांची भेट घेणार आहोत, अशी भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. (Ajit Pawar News in Marathi)

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील हे आज सायंकाळी साडेसहा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्र्याशी चर्चा करुन पुढील रणनीती ठरवण्यात येईल. सरकार म्हणून आम्ही मुख्यमंत्र्याच्या पाठीशी आहोत. सरकार टिकवण्यासाठी शक्य ती मदत करण्यात येईल, अशी भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

शिंदे गट त्यांच्याकडे ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करत आहेत तर महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आले आहे का, असा सवाल अजित पवार यांना विचारला असता ते म्हणाले की, ''बंडखोर आमदारांचा गट आम्ही शिवसेनेतच असल्याचे सांगत आहे. राज्यात मुख्यमंत्रीही शिवसेनेचे आहेत. त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचा पाठिंबा आहे. म्हणजेच महाविकास आघाडीकडेही पूर्ण बहुमत आहेच ना, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेसचा पाठिंबा नको असल्याची मागणी एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून करण्यात येत आहे. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, त्यांनी त्यांची मागणी पक्षप्रमुखांकडे केली पाहिजे. त्याबाबत त्यांचेच पक्षप्रमुखांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

विधान परिषदेचा जर काही इश्यु निर्माण झाला तर विधान परिषदेचे विद्यमान सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. तर विधानसभेत काही निर्णय झाला विधानसभा अध्यक्षांची जागा रिक्त असल्याने प्रभारी अध्यक्ष जे उपाध्यक्ष आहेत हे त्याबद्दलचा निर्णय घेऊ शकतात. त्यासाठी अॅडव्होकेट जनरलशी चर्चा करु शकतात, तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घेऊ शकतात. त्यांना उत्तर द्यायच असेल तर त्यापद्धतीनेच उत्तर द्यावं लागेल. कायद्याच्या नियमाच्या सगळ्या चौकटीत ते असलं पाहिजे. त्यामुळे आज राज्य सरकार बहुमतात आहे आणि राज्य सरकारला निर्णय घेण्याचे सर्व अधिकार आहेत, ते निर्णय सरकार घेत आहे, असेही अजित पवार यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT