Ajit Pawar Speech Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar Speech : कोर्ट-कचेरीच्या लढाईत अजिबात लक्ष घालायचं नाही; अजितदादांनी दमच भरला!

Chetan Zadpe

Karjat News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) दोनदिवसीय शिबिराचे आयोजन कर्जत या ठिकाणी करण्यात आले आहे. शिबिराचा आज दुसरा दिवस आहे. यासाठी स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. या शिबिरात भाषण करताना राष्ट्रवादी कुणाची याचा निवडणूक आयोगाच्या पटलावरच्या कायदेशीर लढाईची कार्यकर्त्यांनी चिंता करू नका, अशी तंबीच दिली आहे. (Latest Marathi News)

अजित पवार शिबिरात भाषण करताना म्हणाले, "एका महिन्याच्या आतमध्ये गावागावांत पक्षाचे पदाधिकारी नियुक्त करण्याची जबाबदार दिलेली आहे. आपल्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने अधिकाधिक काम करायचं आहे. कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करायला हवे की, आपण कुठे आहोत. त्यानुसार काम केलं पाहिजे."

"आपणच मूळ पक्ष आहोत. पक्षाबाबत सुरू असलेल्या कोर्ट कचेरी प्रकरणांवर तुम्ही लक्ष देऊ नका, पक्षात लक्ष देणारी लोकं आहेत, ते याबाबत लक्ष देतील. पक्षांच्या आता लॉबिंगसारखे प्रकार अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. किमान समान कार्यक्रमासाठी आपण सत्तेत सहभाग घेतला आहे," असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, "लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर आणि नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर एनडीएचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची तिसऱ्यांदा निवड व्हावी, ही आपली इच्छा आहे. आणि त्यादृष्टीने आपल्याला काम करायचे आहे. सर्वात जास्त खासदार महायुतीचे निवडून आले पाहिजेत, यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे, असा आदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला."

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT