Ambadas Danve Sarkarnama
मुंबई

Ambadas Danve : अब्रुनुकसानीचा दावा करणाऱ्या सत्तारांना अब्रु तरी आहे का ? दानवेंचा घणाघात

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : शिवसनेचे नेते, राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रावर (Saamana Editorial) अब्रु-नुकसामीचा दावा ठोकणार असल्याचे विधान शनिवारी केले आहेत.

सत्तार यांनी १५० कोटींचा अपहार केला, अशा आशयाच्या बातम्या छापल्या म्हणून, सत्तारांकडून ही नोटीस पाठवली जाणार आहे. यावर ठाकरे गटाचे नेते, विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी समाचार घेतला.

ठाकरे गटाचा मेळावा सुरु आहे. या मेळाव्यात अंबादास दानवे होते. ते म्हणाले, "कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे सांगितले आहे. पण त्यांची अब्रु तरी शिल्लक राहिली आहे का? सत्तार दावा कधी दाखल करणार यांची आम्ही वाट पाहत आहोत,"

"बोगस बियाणांबाबत जे छापे टाकण्यात आले त्यात मंत्र्यांचा पीए कसा आला, बियाण्यांच्या काळाबाजाराकडे शिंदे-फडणवीस सरकार दुर्लक्ष करीत आहेत. प्रत्येक राज्याच्या हवामानानुसार येथील बियाणांची निर्मिती केली जाते. पण तसे न करता सरकारने तेलगंणामधून बियाणे खरेदी केले आहे," असे दानवे म्हणाले.

"गुजरातमध्ये तयार झालेल्या बियाण्यांची विक्री विदर्भ आणि मराठवाड्यात केली जात आहे. या बोगस बियाणांचे ५४ कृषीकेंद्र बंद केली आहेत. सत्तारांसारख्या भष्ट्राचारी मंत्री य राज्यात आहे. भ्रष्टाचाराचं तैमान घालणारे हे कृषीमंत्रालय आहे," असा आरोप दानवे यांनी केला आहे.

शनिवारी अब्दुल सत्तार म्हणाले की १५० कोटींचा निविदा काढल्या, असं सामनात छापून आलं. यामध्ये आमचा सबंध नाही. याबाबत आरोप करणाऱ्यांनाच स्पष्टीकरण द्यावे लागेल. विरोधपक्ष नेते अंबादास दानवे यांनीही माझ्यावर आरोप केले होते. आरोप करताना त्यांनी सत्यता पडताळून घ्यावी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT