Devendra and Amruta Fadnavis Sarkarnama
मुंबई

Amruta Fadnavis News : देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी अमृता फडणवीसांची खास प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Amruta Fadnavis reaction on Devendra Fadnavis oath taking ceremony : 'ते पुन्हा येतील हे नेहमीच वाटत होतं. कारण, त्यांनी जे..' असंही अमृता फडणवीस यांनी म्हटलेलं आहे.

Mayur Ratnaparkhe

Amruta Fadnavis special reaction on oath-taking ceremony : महायुती सरकारचा आज शपथविधी सोहळा पार पडत आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची या शपथविधी सोहळ्यास प्रमुख उपस्थिती आहे. याशिवाय, अनेक राज्यांचे मुख्यमंत्र्यांसह राजकीय, सामाजिक, बॉलिवूड, क्रीडा, उद्योग क्षेत्राती दिग्गजांची या सोहळ्यासाठी उपस्थिती आहे.

दरम्यान या शपथविधी सोहळ्यापूर्वी देवेंद्र फडणीस(Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मीडियाला खास प्रतिक्रिया दिली आहे.अमृता फडणवीस म्हणाल्या, ''देवेंद्रजी यावेळी सहाव्यांदा आमदार झाले आणि आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत. आनंदाचीही गोष्ट आहे आणि खूप जबाबदारीचीही गोष्ट आहे. मला खूप आनंद होत आहे की, त्यांच्या कष्टाला यश आलं आहे. महायुती एकत्रित आहे आणि पुढे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांनी वाटचाल आता आजपासून त्यांनी सुरू केली आहे, याचा मला खूप आनंद आहे.''

याशिवाय, ''मला वाटतं त्यांचं जीवनच एक संघर्ष राहिलेलं आहे. मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे आणि त्यांची जी जिद्द आहे, की जेव्हा काही करायचं ते ठरवतात तेव्हा ते करून दाखवतात. चिकाटी, संयम खूप लागतो. मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल. संयम, जिद्द आणि चिकाटीमुळे ते आज इथे आहेत.'' असंही अमृता फडणवीसांनी(Amruta Fadnavis) म्हटलं आहे.

तसेच 'आज अतिशय सुंदर असा दिवस आहे. आनंद तर आहेच पण जबाबदारीचीही अनुभूती येत आहे. कारण, त्यांना आता खूप काही महाराष्ट्रासाठी करायचं आहे आणि आपल्याला त्यांना यामध्ये साथ द्यायची आहे, या जबाबदारीची जाणीव मनात आहे.' असंही त्यांनी बोलून दाखवलं.

याचबरोबर 'ते पुन्हा येतील हे नेहमीच वाटत होतं. कारण, त्यांनी जे कष्ट घेतले, त्यांची जी दूरदृष्टी होती. तर त्यांना यायच होतं मग ते भगिनींसाठी असो, शहरांच्या पायभूत सुविधा, विविध योजना, शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहण्यासाठी, तरुणाईसाठी मुलींसाठी एवढ्या चांगल्या योजना निर्माण केल्या आहेत. ज्याप्रकारे मुंबई, नागपूर सारख्या शहरांचा विकास केला आहे. त्यामुळे मला विश्वास होता की, ते नक्कीच येतील.' अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT