Eknath Shinde-Sanjay Gaikwad-Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Sanjay Gaikwad Statement : फडणवीसांनी डोळे वटारताच शिंदेंचा गायकवाडांना फोन; कडक शब्दांत दिली तंबी, गायकवाडांची दिलगिरी; पण...

Mahayuti Political News : पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यबाबत संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, दिलगिरी व्यक्त करताना आपण काही ठराविक अधिकाऱ्यांवर केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 27 April : पोलिस आणि गृहखात्याबाबत वादग्रस्त विधान करणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोळे वटारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने फोन करत आमदार गायकवाड यांना तंबी दिली. ‘यापुढे अशी विधाने होणार नाहीत, याची काळजी घ्या’ अशी सक्त ताकीद शिंदेंनी गायकवाड यांना दिल्याची माहिती आहे.

दरम्यान, पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यबाबत संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, दिलगिरी व्यक्त करताना आपण काही ठराविक अधिकाऱ्यांवर केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील पोलिस (Maharashtra Police) दलासारखं अकार्यक्षम विभाग जगात कुठेच नाही. सरकारने कोणतेही कायदे केले की त्यांचे हप्ते वाढतात. दारुबंदी, गुटखाबंदी केली की पोलिसांचे हप्ते वाढतात. राज्यातील आणि देशातील पोलिसांनी कार्यक्षमतेने काम केले तर या जगातील सर्व घाण खत्म होऊ शकते. पोलिसांनी केवळ आपले कर्तव्य प्रमाणिकपणे बजावणे गरजेचे आहे. तेवढं केलं तर सर्व गुन्हेगारी बंद होईल, असे विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. या प्रकरणी संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

संजय गायकवाड यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नाराजी व्यक्त केली होती. पोलिसांबद्दल असं बोलणं योग्य नाही. संजय गायकवाड यांना कडक समज द्या. हे चालणार नाही, हे योग्य नाही, असं मी एकनाथ शिंदे यांना सांगणार आहे. संजय गायकवाड हे वारंवार असं बोलत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संजय गायकवाड यांना तंबी दिल्याचे सांगण्यात येत आहे. पुन्हा अशी विधानं होणार नाहीत, याची काळजी घ्या, अशी ताकीदही शिंदे यांनी दिल्याची माहिती आहे.

याबाबत संजय गायकवाड म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाजवी आहे. त्यानंतर मला एकनाथ शिंदे यांचाही फोन आला होता. पण जी काही नावं घेतली होती, त्यांच्याबद्दल माझं ते विधान होतं. महाराष्ट्र पोलिसांची कर्तबगारी, धाडस, साहस याबद्दल मला काही बोलायचं नाही. त्यांच्या कामगिरीबद्दली आम्हाला आभिमानच आहे. मी जे काही बोललो आहे आणि त्यावरून पोलिसांची मनं दुखावली असतील मी दिलगिरीही व्यक्त केलेली आहे.

मी बुलडाणा जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांची नावे घेतली आहेत, त्यांच्याबाबत मी आजही ठाम आहे. मात्र, महाराष्ट्रतील इतर पोलिस अधिकाऱ्यांच्या कामाबद्दल आम्हाला अभिमान आहे, असेही गायकवाड यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT