Mumbai News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र येण्याच्या जोरदार चर्चा सुरू आहे. भाजप खासदार नारायण राणे यांनी या दोघांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर तिखट शब्दांत टीका केली होती. या टीकेला आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.1 जुलै) माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, खरे तर नारायण राणे आणि राणे फॅमिलीची चोच नेहमी नरकातच बुडालेली असल्याची घणाघाती टीका केली आहे.
तसेच परवाच्या दिवशी मंत्री असलेला नेपाळी वॉचमनसारखा दिसणारा पोरगा त्याने कोणत्या भाषेत माझ्यावर टीका केली? हेच मंत्री भारतीय जनता पक्षाच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे ज्यांची चोच ही कायम नरकातच बुडालेली असते, अशा लोकांबद्दल पुन्हा मला विचारू नका, असा पलटवार जाधवांनी यावेळी केला.
याचवेळी भास्कर जाधव यांनी भाजप नेते नारायण राणेंवर (Narayan Rane) टीकेचा बाण सोडला. ते म्हणाले, आठ दिवसांपूर्वीच मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी नारायण राणेंना त्यांची जागा दाखवून दिली आहे. राणे यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल किंवा त्यांच्या मुलानं त्यांच्याबद्दल जे वक्तव्य केले, त्यावर प्रकाश महाजन यांनी नारायण राणे हा एहसान फरामोश माणूस असं म्हटलं. महाजनांनी राणेंना दिलेले उत्तर पुरेसं असल्याचं म्हणत राणेंना डिवचलं.
जाधव म्हणाले,राणेंनी इतरांची काळजी करण्यापेक्षा तुम्ही तुमचा पक्ष का सोडला?तुम्ही तुमचा पक्ष काढला आणि एक वर्षात आपला पक्ष का सोडला? त्याचे उत्तर महाराष्ट्राला द्या.तुम्ही काँग्रेस पक्ष का सोडला? त्याचे उत्तर महाराष्ट्राला द्या.तुम्ही भाजपाच्या चिपळूणच्या मेळाव्यात रवींद्र चव्हाण यांना इशारा का दिला? त्याचं उत्तर राणेंनी द्यावं असा टोलाही जाधवांनी लगावला.
नारायण राणे यांनी इतरांची काळजी करण्यापेक्षा तुम्ही तुमचा पक्ष का सोडला? तुम्ही तुमचा पक्ष काढला आणि एक वर्षात आपला पक्ष का सोडला? त्याचे उत्तर महाराष्ट्राला द्या. तुम्ही काँग्रेस पक्ष का सोडला? त्याचे उत्तर महाराष्ट्राला द्या असंही आमदार भास्कर जाधव म्हणाले.
मनसे नेते राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तब्बल 20 वर्षांनी एकत्र येणार आहेत. यावर भाजपचे खासदार नारायण राणे यांनी सडकून टीका केली होती. जो बूंद से गई, वो हौद से नहीं आती...,असा चिमटा काढला होता.
तसेच उद्धव ठाकरे भाऊबंदकी या नात्याने राज ठाकरे यांना परत जवळ करायचे प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता,पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची यांना जाणीव नाही वाटतं? आणि आता का म्हणून लाळ ओकताहेत, असा सवालही राणेंनी उपस्थित केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.