Maharashtra Political crises|
Maharashtra Political crises|  
मुंबई

मोठी बातमी: शिंदे गटाने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षात मोठी घडामोड समोर आली आहे. बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याच दावा केला आहे. या याचिकेत 38 शिवसेना आमदारांनी व अपक्ष आमदार असे 51 आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाने महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी आव्हान दिले आहे.

शिवसेनेतील बंडखोरांसह गुवाहटीत असेलले नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रात परत येण्याचा आदेश देण्यात यावा. अनेक मंत्री हे महाराष्ट्राबाहेर असल्याने नागरिकांना सेवा देण्यात अडचण येत आहे, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या नेत्यांना नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठी जनतेने निवडून दिले आहे. मात्र ते कार्यालयात येत नसल्याने कामांचा खोळंबा झाल्याचा मु्द्दा यात मांडण्यात आला आहे

मुख्य न्यायमूर्ती दीपंकर गुप्ता यांच्या खंडपीठापुढे बाबूराव चंदावार यांनी अॅड असीम सरोदे यांनी ही याचिका दाखल केली आहे. तसेच, शिवसेना नेत्यांच्या जिवाला धोका असल्याचंही या याचिकेत म्हटलं आहे. यासोबतच संजय राऊत यांच्या वक्तव्याच्या व्हिडीओच्या लिंक सोबत देण्यात आल्या आहेत.

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेकडून होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गटान सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बंडखोर आमदारांवर होणाऱ्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी शिंदे गटाने या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. तसेच अजय चौधरींच्या गटनेते पदावरही शिंदे गटाने आक्षेप घेण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT