Mumbai News: "काही लोकं निवडणूक आली की, मराठी माणूस मुंबईबाहेर गेल्याची आवई उठवतात, राजकारण करतात. मात्र, आम्ही तसं करणार नाहीत, आमचा प्रयत्न प्रामाणिक आहे", असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला. मुख्यमंत्री शिंदे सोमवारी मुंबईत म्हाडाच्या कार्यक्रमात बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे दोन दिवसांच्या सुट्टीवर साताऱ्यातील आपल्या गावी गेले होते. मात्र, यावरूनच विरोधी पक्षांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. यावरूनच मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर पटलवार करत जशास तसे उत्तर दिले.
म्हाडाच्या माध्यमातून सामान्य माणसाला बळ देण्याचे काम सरकार करत आहे. घर हे सर्व सामान्य माणसाचे स्वप्न असते. आपण सर्वसामान्य माणसाचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम करत असल्यामुळेच म्हाडावर लोकांचा विश्वास वाढला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
"म्हाडाच्या घरांचे वाटप करताना आपण त्यामध्ये पारदर्शकता आणली. आता लॉटरी पद्धतीच्या माध्यमातून हे घरे देण्यात येतात. या लॉटरीमुळे मुंबईबाहेर गेलेले मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले.
याच कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवरही निशाणा साधत काही लोकं निवडणूक आल्यावर जागे होतात आणि मराठी माणूस मुंबई बाहेर गेल्याची आवई उठवतात, पण आम्ही तसे करणार नाही. आम्ही त्यांच्या टिकेला कामातून उत्तर देतो. राजकीय इच्छा शक्ती असली की चांगली कामे करता येतात, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंना लगावला.
Edited By- Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.