Eknath Shinde Latest Marathi News, Uddhav Thackeray Latest News
Eknath Shinde Latest Marathi News, Uddhav Thackeray Latest News Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : जो काँग्रेस-राष्ट्रवादी के जंजिरों में अटके है, उनके..! मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर बाण

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंकडून (Aaditya Thackeray) बंडखोर आमदारांवर सातत्याने टीका केली जात आहे. पाठीत खंजीर खुपसला, गद्दार अशा शब्दांचे बाण सोडले जात आहे. बंडखोरांनी आई-वडिलांच्या नावाने मतं मागावीत, असं आव्हानही ठाकरेंनी दिलं आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सूचक इशारा दिला. पाठीत खंजीर कुणी खुपसला हे वेळ आल्यावर सांगेन, असं शिंदे यांनी म्हटलं आहे. (CM Eknath shinde Latest News)

दिल्लीला जाण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी पुन्हा ठाकरेंचं उल्लेख टाळून टीका केली. ते म्हणाले, मला कुणावरही टीका करायची नाही. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार आम्ही पुढे घेऊन चाललो आहे. त्या विचारांना आम्ही पुढे नेत असल्याने जनतेने स्वीकारले आहे. त्यामुळे आम्हाला मोठं समर्थन मिळत आहे. आम्ही घेतलेली भूमिका महाराष्ट्राला पुढे घेऊन जाईल.

बाळासाहेब हे आमचे कुटुंबप्रमुख होते. तेही आम्हाला कुटुंबातले मानत होते. बाळासाहेब हे आम्हाला वडिलांसारखे होते. पाठीत खंजीर खुपसले, हे सातत्याने बोलले जात आहे. मी त्यावर एवढंच बोलू शकतो, जो काँग्रेस-राष्ट्रवादी के जंजिरों में अटके है, उनके मुहसे खंजीर की बात अच्छी नही लगती. खंजीर कुणी कुणाच्या पाठीत खुपसला, हे मी योग्यवेळी बोलेन, अशा शब्दांत शिंदे यांनी टीकास्त्र सोडलं.

बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा कुणी केली, हे सर्वश्रृत आहे. जनमताचा कौल तोडून जे सरकार स्थापन झाले त्यावरच आमदारांचा आक्षेप आहे. म्हणून आम्ही ही भूमिका घेतली आहे. शिवसेना हे कुटुंब बाळासाहेब मानत होते. ते महापुरूष होते. त्यांच्या आशीर्वादामुळेच हे सरकार स्थापन झाले आहे. हे अडीच वर्षांपूर्वीच व्हायला हवे होते. त्याची दुरूस्ती आम्ही आता केली आहे. शिवसेना-भाजप युती निवडणुकीपुर्वी केली होती. अडीच वर्षांपूर्वीच युतीचे सरकार यायला हवे होते, याचा पुनरूच्चार शिंदे यांनी केला.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या ठाणे, भिवंडी, मनमाड, नाशिक, औंरगाबाद, नेवासा, शिर्डी येथील शिवसंवाद दौऱ्याला मिळालेला प्रतिसाद पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखीलअ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मुख्यमंत्री आपल्या गावी मोहिमेअंतर्गत शिंदे येत्या ३० व ३१ जुलै रोजी नाशिक, औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. अब्दुल सत्तार यांनी ही माहिती प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT