Eknath Shinde-Fadnavis
Eknath Shinde-Fadnavis sarkarnama
मुंबई

Eknath Shinde| न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया: मी नाही....

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत उच्च न्यायालयाने (High court) शुक्रवारी महत्त्वाचा निर्णय दिला. दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला परवानगी नाकारणारा मुंबई महापालिकेचा निर्णय अयोग्य असल्याचे शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली. तर शिंदे गटाची याचिका फेटाळून लावण्यात आली. मुंबई महानगरपालिकेने या मेळाव्याला परवानगी न देण्याचा निर्णय हा कायदेशीर प्रक्रियेचा उघडउघड दुरुपयोग असल्याचं निरिक्षण उच्च न्यायालयाने नोंदवलं.

दरम्यान न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिवसेना समर्थकांसह मुंबईबरोबरच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला. असे असतानाच रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माध्यमांनी न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. पण मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलण्यास थेट नकार दिला.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांच्यापासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते अजित पवार, शिवसेना आणि शिंदे गटाच्या अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया दिल्या. पण मुख्यमंत्री शिंदे अलिप्त होते. मात्र रात्री उशीरा शिंदे ठाण्यामधून मुंबईकडे रवाना होताना त्यांकडे पत्रकारांनी यासंदर्भात त्यांना प्रश्न केले.

मुख्यमंत्री शिंदे घरातून बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमाना त्यांना न्यायालयाच्या निर्णयावर बोलणार का?” असा प्रश्न विचारला. पण एकनाथ शिंदे यांनी हातवारे करत, “नाही, प्रवक्ते बोलतील” असं तीन शब्दांतचं उत्तर दिलं. त्यावर पत्रकारांनीही त्यांना “ओके, ओके” असं उत्तर दिलं. माध्यमांच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर न देता मुख्यमंत्री निघून गेले.

पण दूसरीकडे हा निकाल लागल्यानंतर शिवसेनेच्या नेत्याकडून आनंद व्यक्त केला जात आहे. तर न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत आणि आभार मानले जात आहे. यावर लगेच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि उपनेत्या सुष्मा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार राऊत म्हणाले की, न्याय व्यवस्थेचे आभार, आम्हाला न्याय मिळेल यावर आधीपासूनच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विश्वास होता. यामुळे परंपरेनूसार ५ ऑक्टोबरला दसरा मेळावा होणार आहे. आतापर्यंत शिवसेनेचे परंपरेनुसार मेळावे इथेच घेतले गेले. आताही इथेच होणार आहे. आमच्या मेळाव्यासाठी व्यत्यय आणण्यासाठी शिंदे गट आणि भाजपने खोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र न्यायालयाने आम्हाला न्याय दिला. आता आमची परंपरा सुरूच राहणार. त्यांनी काळी मांजर सोडण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा न्यायालय त्यांना धडा शिकवेल. आता असाच निर्णय सर्वोच्च न्यायालय देखील देईल, असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT