CM Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, Nawab Malik
CM Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, Nawab Malik sarkarnama
मुंबई

मुख्यमंत्री ठाकरे मलिकांना म्हणाले,''गुड गोईंग''

सरकारानामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि भाजपचे नेत्यांची रोज एकमेकांवर चिखलफेक सुरु असून आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत. मलिक आणि विरोधपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरण आणि आर्यन खान प्रकरणावरुन राजकारण पेटलं आहे.

काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यासह मंत्रीमंडळाने मलिकांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी नवाब मलिक (Nawab Malik) याचे कैातुक केले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांनी नवाब मलिक यांच्या लढ्याला पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांनी मलिक यांचे या लढ्याबद्दल कौतुक केले आहे. मुख्यमंत्र्यांनी 'गुड गोईंग' (Good going) असे म्हणत नवाब मलिक यांनी त्यांचे कौतुक केलं आहे. ''नवाब मालिक यांनी घेतलेली भूमिका पुढे सुरू ठेवावी,'' अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी मलिकांनी दिली आहे.

मलिक-भाजपच्या नेत्यांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांमुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे, असे म्हणत कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ''या प्रकरणात वरिष्ठांनी लक्ष घालावे, हे प्रकरण थांबवावे,'' असे आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मलिकांचं 'गुड गोईंग' अशा शब्दात कौतुक केल्याची माहिती मिळत आहे.

नवाब मलिक यांचा अंडरवर्ल्डशी संबध असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मात्र,अंडरवर्ल्डचे लोक, ज्यांचे संबंध आहेत, गुन्हेगार आहेत. तुम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना त्या लोकांना सरकारी कमिशन आणि बोर्डांचं अध्यक्ष का बनवलं?, असा सवाल नवाब मलिक यांनी केला. मुन्ना यादव नावाचा व्यक्ती नागपूरचा गुंड आहे. तो आपला राजकीय दबाव करणारा साथीदार आहे. त्याला आपण कन्स्ट्रक्शन बोर्डाचा अध्यक्ष बनवलं होतं की नाही. मुन्ना यादव तुमच्या गंगेत पवित्र झाला होता की नव्हता?, असा सवाल मलिकांनी उपस्थित केला आहे.

''राज्यातल्या ठाकरे सरकारचे कपडे कसे अंडरवर्ल्डमध्ये भिजलेले आहेत,'' हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघड केले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याची दखल घेऊन पोलिसांमार्फत चौकशी करावी,'' अशी मागणी भाजपचे नेते आशिष शेलार (ashish shelar) यांनी नुकतीच केली.

"नवाब मलिक यांची पत्रकार परिषदेत म्हणजे.. कबूल.. कबूल.. कबूल.. असा कबुलीनामा होता,'' अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. ते म्हणाले, ''अंडरवर्ल्डशी असलेले संबंध झाकण्यासाठी मलिक चांडाळचौकडी करत आहेत. आमची हयात विरोधी पक्षात गेली. आम्ही घाबरत नाही. नवाब मलिक यांना फटाके भिजलेले दिसले. पण त्यांचा चेहरा घामाने भिजलेला असल्याचं दिसलं. सरदार शहावली खान हा 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहे. त्याच्याशी मलिक यांचे आर्थिक व्यवहार आहेत.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT