Jitendra Awhad
Jitendra Awhad  Sarkarnama
मुंबई

मोठी बातमी : जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर

सरकारनामा ब्यूरो

Jitendra Awhad News : राष्ट्रावादी काँग्रेसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर सोमवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आव्हाड यांना आज (ता.15 नोव्हेंबर) सकाळी ११ वाजेपर्यंत अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होईपर्यंत अटकेची कारवाई करू नये, असे निर्देश कोर्टाने मुंब्रा पोलिसांना निर्देश दिले होते. आता त्यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी पार पडली. यानंतर न्यायालयाने आपल्या निर्णय दिला. न्यायालयाने आव्हाड यांना अटक पूर्ण जामीन मंजूर केला आहे.

ठाणे कोर्टाने आव्हाड यांना जामीन मंजूर केला. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर आव्हाड यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती प्रणय गुप्ता यांनी हा निर्णय दिला. दरम्यान, न्यायालयामध्ये आव्हाड यांच्या वतीने तिथे घडलेल्या सर्व प्रकरणाच्या क्लिप सादर करण्यात आल्या होत्या. तसेच आधीच्या सभेमध्ये सबंधीत महिलेला बहिन असे संबोधले होते, ती क्लिप सुद्धा न्यायालयात सादर करण्यात आल्या होत्या. तसेच त्या महिलेला गर्दीतून बाजूला जाण्यास सांगतो होतो. माझ्यावर राजकीय हेतुने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे आव्हाडांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले होते.

दरम्यान, जितेंद्र आव्हाडांच्या (Jitendra Awhad) पत्नी ऋता आव्हाड यांनी मुंब्रा पोलिसांना पत्र लिहिले होते. त्या पत्रात त्या म्हणाल्या होत्या की 'तक्रारदार महिला पोलीस संरक्षण मिळावे म्हणून आरोप करू शकते. आव्हाडांच्या नावाने तक्रारदार महिलेला धमकीचा फोन जाऊन खोटी तक्रा होऊ शकते. त्यासाठी यांच्या नावाने तक्रारदार महिलेचा धमकीचा फोन जाऊ शकतो. त्यासाठी अशी कुठलीही तक्रार पोलीस ठाण्याला तक्रार आल्यास चौकशी करून कारवाई करावी.

दरम्यान, आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असे जाहीर केले होते. मात्र, या नंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आव्हाड यांची भेट घेऊन राजीनामा न देण्याची विनंती केली होती. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही पत्रकार परिषद घेत आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये, असे सांगितले होते.

आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली होती. जयंत पाटील आणि अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. या राजीनाम्यावर ऋता आव्हाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. त्या म्हणाल्या होत्या, की, राजीनाम्याच्या निर्णय जनतेनी ठरवला पाहिजे. जितेंद्र आव्हाड हे तीन वेळा आमदार राहिले असून आमदारकीची माळ त्यांच्या गळ्यात जनतेने घातली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT