Mumbai News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यातील प्रमुख पक्षांची असलेली महायुती अन् महाविकास आघाडी म्हणून समोरे जाणार का की, नाही जाणार याची उत्सुकता आहे.
विधानसभा निवडणुकीत यश मिळालेली महायुती नेमका कोणता निर्णय घेते, याची उत्सुकता असतानाच महायुतीमधील शिवसेना पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. मात्र, भाजपने 'स्थानिक'च्या निवडणुकांसाठी स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीमधील भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार (Ajit Pawar) यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं यश मिळालं. या यशामुळे तिन्ही पक्ष आगामी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवतील, अशी चर्चा होत आहे. परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद अशा निवडणुकांमध्ये महायुतीचा भगवा फडकवायचा, असे म्हणत महायुतीचे संकेत दिलेत.
राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांवर गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून प्रशासक आहे. देशाची लोकसभा आणि राज्याची विधानसभा निवडणूक (Election) झाली. आता स्थानिक स्वराज संस्था आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष लागले आहे. स्थानिक नेते, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्या अनुषंगाने तयारी देखील सुरू केली आहे. असे असले, ती या निवडणुका कधी होणार, हे अजून स्पष्ट नाही.
आता विधानसभा निवडणुकानंतर काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, अशी चर्चा आहे. महायुतीमधील काही नेत्यांनी तसे स्थानिक नेते, पदाधिकारी यांना तयारी लागा, अशा सूचना देखील दिल्या आहेत. परंतु या निवडणुका राजकीय पक्ष स्वबळावर लढणार की युती-आघाडीतून लढणार यावर सहमती झालेली नाही. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीत हेवेदावे सुरू झाले आहेत.
महायुतीमधील तिन्ही पक्ष मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या अनुषंगाने जाहीरपणे काही न बोलता तयारीला लागलेले दिसतात. यातच महायुतीमधील भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढावी, असा आग्रह धरला आहे. असे असतानाच महायुतीतील शिवसेना पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका कशा लढल्या जातील, याविषयी ठाण्यातील कार्यक्रमात मोठं भाष्य केले.
एकनाथ शिंदे म्हणाले, "जनतेच्या न्यायालयात विधानसभा निवडणुकीत आपले 60 आमदार निवडून आल्याने खरी शिवसेना कुणाची हे जनतेने ठरवले. काही जणांनी मंत्रिमंडळही तयार केले होते. हाॅटेलही बुक केले होते. पण, जनतेने आणि लाडक्या बहिणींनी त्यांचे बुकींग रद्द केले. विरोधक अस्मान दाखवले. विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा भगवा फडकवायचा आहे, असे सांगून महायुतीचे संकेत दिले".
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.