Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis News : 'महाराष्ट्राच्या संस्कृतीची एवढीच तुम्हाला चिंता असेल, तर...' ; फडणवीसांचा विरोधकांना टोला!

Mayur Ratnaparkhe

Devendra Fadnavis Press : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशाच्या पूर्वसंध्येस रविवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार या तिघांमध्येही अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी संयुक्तपणे पत्रकारपरिषद घेतली. ज्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावल्याचे दिसून आले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले, 'उद्यापासून राज्याचं अधिवेशन सुरू होत आहे. सर्वांना कल्पना आहे की, निवडणुका समोर असल्याने प्रथा-परंपरेनुसार अंतिरम बजेट हे अर्थमंत्री अजित पवार सादर करतील. या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि अनेक महत्तावाचे निर्णय़ सुद्धा या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याशिवाय 'आज खरं म्हणजे आमच्या विरोधी पक्षांची पत्रकारपरिषद मला फारशी पाहता आली नाही. परंतु त्यांचं एक पत्र मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. ते जे पत्र आहे, मला असं वाटतं की अंतिम आठवडा प्रस्तावाचा मसुदा. हा या पत्राच्या माध्यमातून त्यांनी दिलेला आहे. नेमकं कोणत्या गोष्टीवर फोकस करावं. हे विरोधकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे गोंधळल्यासारखी त्यांची स्थिती आहे.

राज्यासमोरचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यावर सरकार सातत्याने काम करत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांना मदत देण्याचे प्रश्न, अवकाळी पाऊस, दुष्काळाचे प्रश्न असतील. अशा प्रत्येक ठिकाणी मदत करण्याचं धोरण हे सरकारने सातत्याने घेतलं आहे. विकासकामे सुद्धा अत्यंत वेगाने सुरू आहेत. राज्यात मोठ्याप्रमाणात गुंतवणूक सुद्धा येत आहे.' असंही फडणीस म्हणाले.

तर 'विशेषकरून मराठा समाजाच्या संदर्भात दहा टक्के आरक्षणाचा कायदा तयार करून, राज्य सरकारने आणि विशेषकरून मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला होता, तो शब्द सुद्धा पूर्ण केलेला आहे. ' असंही यावेळी फडणवीसांनी बोलून दाखवलं.

याचबरोबर 'या पत्रात एक वाक्य मला जरा मनोरंजनासारखं वाटलं. त्यात असं म्हटलं की, सभांमध्ये अर्वाच भाषेत शिवीगाळ यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लागत आहे. आता हे पत्र आमच्यासाठी लिहिलं आहे की सकाळी नऊ वाजता जे पत्रकारपरिषद घेतात. त्यांच्यासाठी लिहिलं आहे हा माझा पहिला प्रश्न आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीची जर एवढीच तुम्हाला चिंता असेल, तर एक पत्र त्यांनाही द्या. जे कुठले कुठले शब्द वापरतात, काय काय बोलतात. म्हणून मला असं वाटतं की आताच्या परिस्थितीत विरोधी पक्षाची परिस्थिती ही एका निराशेतून ते जात आहेत, अशी आहे.' अशा शब्दांत फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT