Ravi Rana-Sharad pawar-Bacchu Kadu
Ravi Rana-Sharad pawar-Bacchu Kadu Sarkarnama
मुंबई

राणांसोबतच्या वादानंतर शरद पवारांचा फोन आला होता का? बच्चू कडूंनी दिले हे उत्तर...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : पन्नास खोक्यांच्या आरोपावरून आमदार रवि राणा (Ravi Rana) यांना आव्हान देणारे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना या वादाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचा फोन आल्याची चर्चा रंगली आहे. त्याबाबत आता आमदार कडू यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (Did Sharad Pawar get a call after dispute with Rana? Bacchu Kadu gave this answer...)

आमदार रवि राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर पन्नास खोक्यांच्या अनुषंगाने आरोप केले होते. दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या दोघांमधील वाद मिटविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार आमदार रवि राणा आणि आमदार बच्चू कडू यांनी मुंबईत येऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आमदार रवि राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केलेल्या आरोपांप्रकरणी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली. मात्र, बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत. त्यानंतर माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांना पत्रकारांनी शरद पवार यांच्या फोनसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला हेाता.

पत्रकारांच्या प्रश्नावर माजी मंत्री बच्चू कडू म्हणाले की, रवि राणा यांच्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा मला काही फोन आला नव्हता. यासंदर्भात आमची अशी कोणतीही चर्चा झाली नाही, असेही आमदार रवि राणा यांनी स्पष्ट केले. दरम्यान, काल बच्चू कडू यांना सुप्रिया सुळे यांनी पाठिंबा दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT