Eknath Shinde  Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : कोणामुळे मुख्यमंत्री झालो? ठाण्यातल्या कार्यक्रमात शिंदेंनी सांगून टाकलं

Pankaj Rodekar

Eknath Shinde Thane News :

सुविधांचे प्रकल्प करणारे महाराष्ट्र हे राज्य देशातील पहिले राज्य आहे. तसेच परदेशी गुंतवणुकीमध्येदेखील आपलं राज्य आपलं सरकार यायच्या अगोदर दोन-तीन नंबरने मागे गेले होते, पण जसे आपले सरकार आल्यानंतर सहा महिन्यांमध्ये पुन्हा महाराष्ट्र हे राज्य परदेशी गुंतवणुकीत पुन्हा पहिल्या नंबरवर आपण आणले. त्यामुळे हे सर्वसामान्यांचे आपलं सरकार महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ठाण्यात शनिवारी पार पडलेल्या म्हाडा लॉटरीवेळी ते बोलत होते.

जगात तिसऱ्या क्रमांकावर भारताची अर्थव्यवस्था आणण्याचा संकल्प आहे. आपला महाराष्ट्र त्यामध्ये वन मिलियन डॉलर हा गोल जो आहे अचिव केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी या वेळी व्यक्त केला.

कोकण विभागातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत 5 हजार 311 सदनिका विक्रीची संगणकीय सोडत ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढण्यात आली. या वेळी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक आणि भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते.

म्हाडाच्या माध्यमातून आतापर्यंत नऊ लाख घरे दिली, ही संख्या मोठी आहे. तसेच गिरणी कामगारांनाही घरे देण्यास सुरुवात केली आहे. मुंबईप्रमाणे ठाण्यातही गिरणी होती, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ज्यांना या लॉटरीमध्ये घर मिळणार आहेत, त्यांचे अभिनंदन. ज्यांना मिळणार नाहीत, त्यांचेसुद्धा अभिनंदन. त्यांना दुसऱ्या लॉटरीत घरे मिळतील आणि त्यांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असेही या वेळी मुख्यमंत्री म्हणाले.

पंतप्रधान आवास योजना ही शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही सुरू आहे. त्यातच सोलापुरात 30 हजार घरांची लॉटरी काढण्यात आली. शिवाय म्हाडावरील लोकांचा विश्वास वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. लॉटरी करताना पारदर्शकता असल्याचे सांगून येथे कोणाच्याही शिफारशीला वाव नाही. आपले हे सर्वसामान्यांचे सरकार असून, दुजाभाव करणारे हे सरकार नाही. म्हणून गेल्या दीड वर्षामध्ये अनेक निर्णय आपल्या सरकारने घेतले, मग पायाभूत सुविधा असतील, त्यामध्ये अटल सेतू तसेच बाळासाहेब ठाकरे समृद्धी हायवे, अशा प्रकारचे गेम चेंजर प्रकल्प तयार करू शकलो. आज ठाण्यामध्येदेखील आपण बायपास करतोय. आपण उड्डाणपूल करतोय अगदी शहराच्या बाहेरच्या बाहेरून मार्ग आपण काढतोय. ही वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी अनेक प्रकल्प आपण हाती घेतोय, असेही ते म्हणाले. त्यामुळे पायाभूत सुविधांचे प्रकल्प करणार आहे. आपले राज्य देशातले पहिले राज्य आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वेळेमध्ये जी घरं पूर्ण करतील त्यांना बक्षीस द्या

म्हाडाचे प्रकल्प वेळेमध्ये प्रकल्प पूर्ण झाले पाहिजेत. काही प्रकल्प एवढे रेंगाळतात की त्या प्रकल्पाची चव निघून जाते आणि मग त्या प्रकल्पात दुरुस्ती करावी लागते, अशी प्रकरणं मुंबईमध्ये अनेक पाहिली. परंतु म्हाडामध्ये आता आपले सरकार आल्यानंतर सर्व वस्तुस्थिती बदललेली आहे. सर्व पॅटर्न बदललेला आहे आणि वेळेमध्ये ही घरे पूर्ण झाली पाहिजेत, वेळेमध्ये जी घरं पूर्ण करतील त्यांना बक्षीस द्या. तसेच वेळेमध्ये पूर्ण करणार नाही त्यांना दंड लावा, असेही ते म्हणाले. तसेच घरे घेताना त्यांची गुणवत्तादेखील आपण तपासावी. याशिवाय ती गुणवत्ता कायम ठेवली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

'ठाणेकरांनी भरभरून प्रेम केले'

ठाण्यात लॉटरी असल्यामुळे मला जास्तीतजास्त आनंद आहे. तुम्ही ठाणेकरांनी मला भरभरून प्रेम केले. त्यामुळेच मी मुख्यमंत्री होऊ शकलो, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शेवटी हे घर वारंवार होत नसतं. मुंबई परिसरामध्ये जास्तीत जास्त घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. घर देण्याची प्रक्रिया अतिशय सुलभ सुटसुटीत करण्याचा प्रयत्न केलाय. या ठिकाणी आपलं सरकार सक्षमपणे आणि अतिशय पॉझिटिव्हली काम करतंय. लोकांच्या हिताचे निर्णय घेतंय.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT