Eknath Shinde News : सांगलीच्या जत तालुक्यामधील सीमावर्ती भागात काही गावांनी कर्नाटकात सामील होण्याचे ठराव केले होते. आमच्या भागात पाण्याचा प्रश्न मागील अनेक दशके सुटले नसल्याची भावना या गावांची होती. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पेटले होते. यावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही जत तालुक्यावर दावा केला होता. यामुळे शिंदे-फडणवीसांनी सरकावर विरोधकांनी केली. आता सीमाभागातील सीमाभागातील लोकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट घेतली आहे.
जत तालुक्यातील सीमा भागातील लोकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. सीमाभागातील पाणी संघर्ष समिती कार्यकर्ते यांनी मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांची आभार मानले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सीमाभागातील गावांचा प्रश्न निकाली काढत तब्बल दोन हजार कोटींचा निधी जाहीर केला आहे. यामुळे वर्षानुवर्षे आपल्यावर अन्याय झाल्याची व विकासाचा अनुषेश काही अंशी भरून निघाल्याची भावना सीमाभागातील पाणी संघर्ष समिती कार्यकर्ते यांनी केली.
सीमाभागातील गावांना भरीव निधी दिल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यासाठी सांगलीच्या सीमाभागातील पाणी संघर्ष समिती कार्यकर्ते मुंबई मध्ये जाऊन सीमाभागातील नागरिकांकडून मुख्यमंत्र्यांचा जाहिर सत्कार ही करण्यात आला. तसेच या प्रतीक्षेतील टेंडर लवकर काढण्यात यावे, अशी मागणी केली यावेळी मुख्यमंत्री यांनी 16 तारखेला टेंडर निघेल असे आश्वासन दिले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.