Mumbai News : विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दणदणीत विजय मिळवल्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा न केल्यामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आलं होतं.तसेच महायुतीत मुख्यमंत्री पदावरुन नाराजीनाट्य असल्याचे बोलले जात होते. तसेच महाराष्ट्राच्या पुन्हा मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आग्रही असल्याची चर्चा रंगली होती.
पण महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी(ता.27) पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर केल्यामुळे महायुतीसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष एकनाथ शिंदेंच्या प्रेस कॉन्फरन्सकडे लागलं होतं. आता शिंदेंनी राजीनाम्यानंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत महायुतीतील मुख्यमंत्रिपदाच्या वादावर रोखठोक भाष्य केलं आहे. ते म्हणाले, निवडणुकीच्या निकालानंतर आपण सर्व पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात भेटतोय.मी जनतेचे आभार मानतो.एवढा मोठा विजय मिळाला आहे.जे काही अडीच वर्षांत महायुतीने जे काही काम केलं आणि लोकांनी विश्वास ठेवला असल्याचं शिंदेंनी सांगितलं.
शिंदे म्हणाले, मविआने त्यांच्या अडीच वर्षांच्या कालावधीत थांबवलेली कामं होतं.तर दुसरीकडे एकीकडे आम्ही केलेली विकासकामं कल्याणकारी योजना आम्ही केल्या सांगड घातलं.हा जनतेचा विजय आहे.महायुतीच्या सर्वांनी निवडणुकीत प्रचंड काम केलं.
मी पहाटेपर्यंत काम करायचो.पुन्हा माझी सभा असायची.हे सत्र पूर्ण निवडणुकीपर्यंत चाललं. 90-100 सभा घेतल्या.पायाला भिंगरी लावून मी साध्या कार्यकर्त्याप्रमाणे काम केलं.मी स्वत:ला एक मुख्यमंत्री कधीच समजलो नाही.एक सामान्य माणूस म्हणून मी काम केलं. सर्वसामान्य जनतेसाठी आपण काही तरी केलं पाहिजे ही भावना आपली होती असंही शिंदे म्हणाले.
कारण मी पण एका शेतकरी कुटुंबातून आलोय. मी भाषणात पण माझे विषय मांडले.ज्या दिवशी असा अधिकार माझ्याकडे येईल, तेव्हा मी सामान्य लोकांसाठी मी काम करेल. काहींना काही केल पाहिजे अशी भावना माझ्या मनात होती. श्रीमंत माणूस किंवा सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना कसं कळणार असा सवालही एकनाथ शिंदेंनी केला.
एकनाथ शिंदे म्हणाले, मी खूप खूष आहे. मला समाधान आहे.एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचा त्यांना कोणताही अडथळा नसणार आहे.जरी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री करण्याचा निर्णय करण्याचा निर्णय घेतला तरी आमचा त्यांना पाठिंबा असेल. अडीच वर्षांत पंतप्रधान मोदी व अमित शाह यांचं पूर्ण पाठबळ आम्हांला मिळाले.सामान्य कार्यकर्त्यावर त्यांनी विश्वास ठेवला. मोदी आणि शाहांना याबद्दल मी धन्यवाद देतो असंही त्यांनी सांगितले.
महायुतीवर या निवडणुकीत मतांचा वर्षाव झाला.ते आम्ही काम केले म्हणून झाला.लाडका बहिणींचा लाडका भाऊ ही माझी ओळख झाली.लाडक्या भावाची ओळख ही सर्व पदापेक्षा मला मोठी आहे.आम्ही नाराज होऊन रडणारे लोक नाही.आम्ही लढणारे लोकं आहोत असंही शिंदेंनी स्पष्ट केलं. यामुळे देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून मार्ग मोकळा झाला आहे.
शिंद म्हणाले, महायुती म्हणून आम्ही जीव तोडून काम केलं, निर्णय घेतले. लोकांमध्ये गेलो. घरी बसलो नाही. शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत जनतेसाठी काम करत राहिल.आज मला केलेल्या कामाचा आनंद आहे.राज्य व केंद्र हे समविचारी सरकार असेल तर राज्याचा विकास वाढतो.अडीच वर्षात मी खूप आम्ही घेतलेले निर्णय ऐतिहासिक होते. कोणत्याही सरकारने निर्णय घेतले नाही असा दावाही महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.