Mumbai News, 19 Mar : नागपूरमध्ये (Nagpur) सोमवारी रात्री दोन गटांतील धार्मिक तेढ निर्माण झाल्यामुळे मोठी दंगल उसळली होती. या दंगली संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात निवदेन दिले.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) उद्धव ठाकरेंसह अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. नागपूरच्या दंगलीवर बोलणाऱ्या ठाकरे गटाला त्यांनी महाविकास आघाडीच्या काळातील घटनांची आठवण करून दिली.
एकनाथ शिंदे म्हणाले, खुर्चीसाठी ठाकरे गटाने बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडली. तुम्ही काँग्रेससोबत जाऊन खुर्ची मिळवली, पण विचारधारा सोडली. यांच प्रमुख (उद्धव ठाकरे) हे पुन्हा युतीत येण्यासाठी प्रयत्न करत होते. नोटीस आल्यावर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) माफी मागितली होती.
आम्ही महायुतीमध्ये सामील होऊ, असं त्यांनी तिथे सांगितलं. पण, इथे येताच त्यांनी पलटी मारली म्हणून आम्ही त्यांचा डाव पलटवून टाकला, असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केला. तर लोकसभा निवडणुकीत दहशतवादी याकुबची कबर कोणी सजवली, पाकिस्तानचे झेंडे कोणी नाचवले? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित करत ठाकरेंच्या शिवसेनेसह महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.
तसंच नोटीसला घाबरून आमदार अनिल परब (Anil Parab) दिल्लीत जाऊन कोणाला भेटले? हे मला माहीत आहे. तिथे जाऊन माफी मागितली आणि राज्यात माघारी येताच पलटी मारली. तुमच्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. मी खुर्चीसाठी काहीही केलेलं नाही. जे काही केलं ते खुलेपणाने केलं, असंही शिंदे यावेळी म्हणाले.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.