Jayant Patil: राज्यात येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. यापार्श्वभूमीवर विरोधकांनी काल राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन मतदार याद्यांमध्ये असलेल्या चुका समोर ठेवल्या होत्या. पण आयोगानं आमच्या हातात काहीही नाही, नावांबाबतचे निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेतला जातो, असं त्यांना सांगण्यात आलं. यापार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचा सर्व्हर हा बाहेरुनच ऑपरेट होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी आज विरोधकांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत केला.
जयंत पाटील म्हणाले, "आमचा समज असा व्हायला लागला आहे की, राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व्हर हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो. आमचा आता असा अनुभव व्हायला लागला आहे. दुसरा कोणीतरी परस्पर या मतदार याद्यांमध्ये नावं टाकतो. मतदार याद्या उघड झाल्या की नावं काढतो. राज्य निवडणूक आयोग असो किंवा केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या हतात काही नाही, कुणीतरी बाहेरुनच ही टीम ऑपरेट करतोय असा याचा अर्थ आहे"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.