Sameer Wankhede Latest Marathi News
Sameer Wankhede Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

आर्यनला क्लिनचिट मिळाल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला क्लिनचिट देण्यात आली आहे. त्याच्याविरोधात तपासात कोणतेही पुरावे आढळून आले नाहीत. याप्रकरणात काही त्रुटी आढळून आल्याची कबुली अमली पदार्थ विरोधी विभागाने (NCB) दिली आहे. त्यानंतर आता एनसीबी मुंबईचे तत्कालीन संचालक समीर वानखेडे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. (Aryan khan latest Marathi News)

समीर वानखेडे यांनीची क्रूझवरील डॅग्ज पार्टीवर छापा टाकून कारवाई करत आर्यन खानसह इतरांना अटक केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केले. आर्यन खानला अडकवले जात असल्याचेही त्यांनी म्हटलं होते. अखेर त्यांनी केलेल्या या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे स्पष्ट झालं आहे. (Sameer Wankhede refuses to speak after Aryan Khan gets clean chit)

आर्यनला एनसीबीने क्लिनचिट दिल्यानंतर समीर वानखेडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न माध्यमांनी केला. सॉरी सॉरी म्हणत त्यांनी यावर अधिक बोलण्यास नकार दिला. मी आता एनसीबीमध्ये नाही. त्यामुळे याप्रकरणावर बोलू शकत नाही. यासाठी एनसीबी अधिकाऱ्यांशी बोला, असे वानखेडे म्हणाले आहेत.

दरम्यान, 'एनसीबी'चे उपमहासंचालक संजय सिंह यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे. त्यांनी यासाठी तीन कारणे दिली आहेत. त्यानंतर आर्यन खानला क्लिनचिट देण्याचा निर्णय़ घेण्यात आल्याचे सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.

आर्यन सुटण्याची ही आहेत तीन महत्वाची कारणे :

1. सुरूवातीलाच आर्यनच्या ज्या मित्राकडे चरस सापडले होते. त्याच्या जबाबात स्पष्टपणे आले आहे की, ते आर्यनसाठी नव्हते. आर्यनने त्याला सांगितले होते की, ड्रग्ज घेऊ नको, एनसीबी सतर्क आहे, असं त्या मित्राच्या जबाबात आले होते.

2. आर्यन खानच्या व्हॉट्स अॅप चॅट बाबतही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्या चॅटमध्ये या केसचा संबंध नाही.

3. आर्यनने ड्रग्ज घेतल्याचा आरोप होता. पण त्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय तपासणीच करण्यात आली नाही. या तीन महत्वाच्या गोष्टी तपासात आढळून आल्या आहेत. त्यामुळे आर्यनविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले नसल्याचे संजय सिंह यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, क्रूझवर एनसीबीने गेल्या वर्षी दोन ऑक्टोबर रोजी कारवाई करीत खळबळ उडवून दिली होती. याच कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आल्याने या प्रकरणाला वेगळ महत्व आले होते. राजकीय क्षेत्रातही यावरुन आरोप-प्रत्यारोप झाले. एनसीबीचे मुंबई विभागाचे तत्कालीन संचालक समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्यात आरोपाच्या फेरी झडल्या. यावरुन राजकारण पेटलं होतं.

26 दिवसांच्या कोठडीनंतर मुंबई उच्च न्यायालयानं आर्यन खानला काही अटी शर्तीसह जामीन मंजूर केला होता. समीर वानखेडे यांच्याकडून हा तपास काढून घेण्यात आला होता. एनसीबीच्या दिल्लीतील पथकाची नेमणुक करण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT