Bhagat Singh koshyari, Governor  maharashtra
Bhagat Singh koshyari, Governor maharashtra Sarkarnama
मुंबई

Koshyari : राज्यपाल बनणं म्हणजे दु:खच दु:ख...; कोश्यारींनी स्वत:च सांगितलं

सरकारनामा ब्यूरो

Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांच्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या विधानावरून ते चर्चेत आले आहेत. राज्यपालपद हे माझ्यासाठी अयोग्य असून राज्यपाल बनणं म्हणजे दु:खच दु:ख असल्याचं विधान त्यांनी केलं आहे.

शुक्रवारी राजभवनामधील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना कोश्यारींनी हे विधान केलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी असे विधान केल्यामुळे त्यांना उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) परतण्याचे वेध लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.

भगतसिंह कोश्यारी म्हणाले, ''राज्यपाल बनने से दुख ही दुख है, सुख तो कुछ भी नहीं है. यामध्ये कोणतेही सुख नाही. त्यामुळे हे पद माझ्यासाठी योग्य नाही. मला कधी कधी वाटतं की मी चुकीच्या ठिकाणी आलोय. मात्र, मी आता ८० वर्षांचा झालोय. त्यामुळे मी आता मुमुक्षरत्न बनू शकत नाही. पण जेव्हा सन्यांसी आणि मुमुक्षरत्न राजभवनात येतात तेव्हा मला आनंद होतो'', असं कोश्यारी म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांच्यावर राज्यभरातून टीका झाली होती. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील विरोधकांनी केली होती. तर आता पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या विधानामुळे कोश्यारी चर्चेत आले आहेत. तसेच त्यांना उत्तराखंडमध्ये परतण्याचे वेध लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT