Jitendra Awhad Sarkarnama
मुंबई

आव्हाड प्रकरणात ठक्करला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची सोशल मीडियावरुन बदनामी केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी समीत ठक्कर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणी ठक्करला मुंबईच उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मंगळवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला.

ठक्कर यांच्या ट्विटर हँडलवरून राष्ट्रवादीचे नेते आव्हाड यांच्या विरोधात ट्विट केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते दिनेश बने यांनी तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीच्या आधारे ठक्कर यांच्यावर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून कलम ४१अ अंतर्गत नोटीस मिळाल्यानंतर ठक्करने अटकपूर्व जामिनासाठी ठाणे येथील सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, सत्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता.

त्या विरोधात ठक्कर यांनी अटकपूर्व जामीनासाठी वकील मदन गुप्ता यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या संदर्भात आज न्यायालयात सुनावणी झाली. त्यामध्ये ठक्कर यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र, त्यांना कोणताही बदनामीकारक मजकूर टाकण्यापासून समित ठक्कर यांनी स्वतःला रोखावे असे मत न्यायालयाने नोंदवले आहे.

दरम्यान, ठक्कर यांच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारची बदनामी केल्या प्रकरणी २३ महिन्यात पाच गुन्हे दाखल आहेत. त्यातील ३ प्रकरणात त्यांना अटकही झाली होती. त्यासर्व प्रकरणात त्यांना जामीन मिळालेला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT