Dilip Walse Patil and Uddhav Thackeray
Dilip Walse Patil and Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

मोठी घडामोड : खार पोलीस ठाण्यात सोमय्या पोचताच गृहमंत्री थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

सरकारनामा ब्युरो

मुंबई : 'मातोश्री'विरोधात पंगा घेणाऱ्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) हे सध्या तुरुंगात आहेत. नवनीत राणांना तुरुंगात हीन दर्जाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत त्यांनी लोकसभेच्या अध्यक्षांनाही पत्र लिहिले होते. यातच किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावरील हल्ल्याचं प्रकरण तापलं आहे. या प्रकरणी सोमय्यांनी खार पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. यानंतर लगेचच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत.

राणा दांत्याला पोलीस ठाण्यात भेटायला गेलेल्या किरीट सोमय्यांवर हल्ला झाला होता. त्यात ते किरळोक जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर पोलिसांत तक्रार देणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी माझी खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप करत ते आज खार पोलीस ठाण्यात पोचले. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला रवाना झाले आहेत. या दोघांमध्ये सोमय्या आणि राणा दांपत्य यांच्याबद्दल चर्चा होणार आहे.

मागास वर्गातील असल्यामुळे तुरुंगात हीन दर्जाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप नवनीत राणांनी केला आहे. याबाबत त्यांनी थेट लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले होते. या पत्रावर लोकसभा सचिवालयाने केंद्रीय गृहमंत्रालयाला आदेश देऊन 24 तासांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत महाराष्ट्र सरकारकडे माहिती मागितली आहे. आज संध्याकाळी याबाबतचा अहवाल मुख्य सचिव केंद्रीय गृह मंत्रालयाकडे सादर करणार आहेत. यामुळे यावर वळसे पाटील आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात चर्चा होणार असल्याचे समजते.

राणा दांपत्याला 23 एप्रिलला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना 24 एप्रिलला त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांच्यावर आणखी काही गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी विविध मुद्दांवर पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने राणा १४ दिवसांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर राणा दांपत्याच्या वकिलांनी लगेच जामिनासाठी अर्ज केला. पण न्यायालयाने त्यावर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला. न्यायालयाने राज्य सरकारला 27 एप्रिलपर्यंत जामीन अर्जावर बाजू मांडण्यास सांगितले आहे. त्यानंतर या अर्जावर 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत राणा दांपत्याला तुरूंगातच राहावे लागणार आहे. ठाकरे सरकारने खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप राणा दांपत्याच्या वतीने न्यायालयात करण्यात आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT