Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : घोसाळकरांच्या हत्येनंतर ठाकरेंची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी; 'सरकार बरखास्त करा अन्...'

Ganesh Thombare

Mumbai News: "गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये उद्विग्न अस्वस्थता आहे. महाराष्ट्राचं मन आणि जनता दुखावली गेली आहे. गुंडांचा हैदाेस सुरू आहे. राज्य सरकारमध्ये गँगवॉर सुरू आहे. गुंडांसोबत मंत्र्यांचे फोटो येत आहेत. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली. गुंडांनी हत्या केली. या गुंडाने स्वतः आत्महत्या का केली ? फेसबुक लाइव्हमध्ये गोळ्या घातल्या, पण गोळ्या कोण घालतंय हे त्यात दिसत नाही. बॉडिगार्डच्या बंदुकीने त्याने गोळ्या घातल्या, असं सांगितलं जात आहे. या प्रकरणावर एकाला अटक केली आहे. पण त्या मॉरिसला बॉडिगार्ड का ठेवावा लागला ? त्या दोघांची सुपारी कोणी दिली होती का ?", असे अनेक सवाल आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत. (Uddhav Thackeray Attack on Shinde- Fadnavis - Pawar Government)

माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीच केली आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या सध्याच्या परिस्थितीवरून आम्ही आपल्या माध्यमातून मागणी करत आहोत की, राज्य सरकार बरखास्त करा, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा आणि लवकर निवडणुका लावा, अशी मोठी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"सर्वोच्च न्यायालयाला आमची विनंती आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे, त्यामुळे आम्हाला न्याय द्या. या सरकारचा वचक राहिला नाही. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला झापलं, पण तरीही काहीच परिणाम झालेला नाही. त्यामुळे न्यायालयाने लवकराच लवकर निर्णय द्यावा आणि लोकशाही वाचवावी. न्यायालयाकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे", असं ठाकरे म्हणाले.

सध्या सुरु असलेल्या घटनांबाबत आम्ही राज्यपालांकडे जाणार नाही, त्या पदाचा काही अर्थ राहिला नाही. आता कोणाकडे आम्ही दाद मागायची हा मोठा प्रश्न आहे. आमची सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी आहे. न्यायालय यावर लवकर निर्णय घेईल, अशी एकच आशा आता आहे. सर्वोच न्यायालयाने नुसतं झापू नये. लवकर निवडणुका जाहीर करतील किंवा यावर लवकर निर्णय घेतला जाईल, एवढीच अपेक्षा आहे, असं ठाकरे म्हणाले.

दरम्यान, मुंबईतील दहिसर येथे झालेल्या गोळीबारानंतर राज्य सरकारला विरोधकांनी चांगलंच घेरलं असून राज्यात अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या. याबाबत आता उद्धव ठाकरेंनी थेट न्यायालयाकडेच राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे यावर मुख्यमंत्री शिंदे किंवा उपमुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT