Imtiaz Jaleel, Raju Shetti, Bachchu Kadu Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics : तिसरी आघाडी सुसाट! राजू शेट्टीनंतर बच्चू कडू अन् इम्तियाज जलील वाढवणार महायुती, आघाडीचं टेन्शन

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीत सन्मानजनक वागवणूक मिळाल्याने महायुती आणि महाविकास आघाडील लहान पक्षाचे नेते एकत्र येत राज्यात तिसरी आघाडीची चाचपणी करत आहेत.

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्तिचे प्रमुख बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीची इच्छा व्यक्त करताच त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी हात पुढे केला आहे.

शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी राज्यात होणाऱ्या तिसऱ्या आघाडीत सहभागी होऊन महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय देणार असल्याचे स्पष्ट केले. ही तिसरी आघाडी विधानसभेत राज्यातील भाजप प्रणीत महायुती आणि महाविकास आघाडीचे टेन्शन वाढणार आहे.

राजू शेट्टी Raju Shetti यांनी गेल्या आठवड्यात इम्तियाज जलील यांची छत्रपती संभाजीनगर येथे भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्यात राज्यात तिसरी आघाडी स्थापन करण्याबाबत चर्चा झाली होती. दोघांनी आघाडी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्याचे मान्य केल्याचेही शेट्टींनी सांगितले होते. त्यास पुष्टी देत जलील यांनीही तिसऱ्या आघाडीची शक्यता तपासली आहे. महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीलो मोठा स्कोप असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तिसरी आघाडी झाली तर त्याचे नेते कोण असतील, याबाबत शेट्टींनी, तिसऱ्या आघाडीला समान नेतृत्व असेल, असे सांगितले. सर्व विभागांना स्वीकारार्ह असलेले एक समान नेतृत्व तिसऱ्या आघाडीसह राज्याला पुढे नेऊ शकेल, असेही ते म्हणाले.

शेट्टी यांच्याशी झालेल्या चर्चेत तिसऱ्या आघाडीसाठी किमान समान कार्यक्रमाबाबतही चर्चा झाल्याचे जलील यांनी स्पष्ट केले. आम्ही तिसऱ्या आघाडीबाबत सकारात्मक आहोत. आम्हाला विश्वास आहे की ते महायुती आणि महाविकास आघाडीला सामोरे जाण्यासाठी एक शक्ती म्हणून उदयास येईल. आम्हाला एक समान किमान कार्यक्रम तयार करावा लागेल.

प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण देण्याबाबत शेट्टी म्हणाले, राज्यात वंचितचा मोठा मतदारवर्ग आहे. तिसऱ्या आघाडीत वंचितला सामावून घेण्यासाठी असण्यास उत्सुक आहे. याबाबत भेटल्यावर चर्चा करणार असल्याचेही शेट्टींनी स्पष्ट केले. दरम्यान, 2 मध्ये वंचितने एमआयएमसोबत करार केला होता. आताच्या लोकसभेत मात्र, त्यांनी एमआयएमला डावलले आणि स्वबळावर निवडणूक लढवली.

तिसऱ्या आघाडीची घोषणा करताना कडू Bachchu Kadu यांनी याला शेतकऱ्यांचा मोर्चा म्हटले जाणार असल्याचे सांगितले होते. आगामी विधानसभा निवडणुकीत आमची शेतकरी आघाडी असेल. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरंगे पाटील यांना शेतकरी आघाडीत सहभागी व्हायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे, असे कडूंनी म्हटले होते.

कडूंच्या या निमंत्रणावर जरंगे यांनी आपण कोणत्याही आघाडीत सामील होणार नसल्याचे स्पष्ट केले. माझा कोणत्याही युतीत सामील होण्यावर विश्वास नाही. आम्ही सर्व 288 जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. आमचे उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील, असेही त्यांनी सांगितले.

कडूंची भूमिका..

राज्यातील शेतकरी, मजूर आणि अपंगांचे प्रश्न आम्हाला मांडायचे होते, पण सत्ताधाऱ्यांना या विषयांवर चर्चा करायला वेळ नाही. आता मुख्यमंत्री कसा प्रतिसाद देतात ते बघू. आता त्यांचा समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही तर पुढील निर्णय घेण्यापूर्वी आम्ही शेतकरी आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचू, असे कडू यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

महायुतीत कडूंचं कुठं बनसलं?

शिवसेनेतील शिंदेंच्या बंडाला साथ देत बच्चू कडू महायुतीत सहभागी झाले. त्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्याची अपेक्षा होती. मात्र तसे झाले नसल्याने ते नाराज आहेत. या नाराजीतून कडू यांनी अमरावती मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांना कडाडून विरोध केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT