Devendra Fadanvis| Raj Thackeray
Devendra Fadanvis| Raj Thackeray sarkarnama
मुंबई

Raj Thackeray : फडणवीसांना राज ठाकरे म्हणाले, "फुकटचं श्रेय घेऊ नका"

सरकारनामा ब्युरो

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला (shiv sena) गळती लागली. अनेक पदाधिकारी , आमदार, खासदार शिंदे गटात समील झाले. शिवसेना फुटीला जबाबदार कोण, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. याला जबाबदार कोण ? याला शिवसैनिक जबाबदार आहेत? की मग भाजपनं शिवसेना फोडली? की मग शरद पवारांनी (sharad pawar) शिवसेना फोडली? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. (raj thackeray latest news)

या साऱ्या सत्तासंघर्षामागे, शिवसेना फुटीमागे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे षडयंत्र असल्याचे बोललं जाते, पण या प्रश्नाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. शिवसेना फुटीमागे कोण आहे, हे राज ठाकरे (raj thackeray) यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केलं. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, "त्या दिवशीच मला भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीस आले होते. मी त्यांना म्हटलं उगाच फुकटचं श्रेय घेऊ नका. ते हसायला लागले जोरात. जी गोष्ट घडली आहे, ती गोष्ट नाही तुम्ही घडवली ना अमित शहांनी घडवली, ना भाजपने घडवली ना अजून कोणी घडवली. याचं श्रेय तुम्हाला उद्धव ठाकरेंनाच द्यावं लागेल. जी गोष्ट घडलेली आहे त्याचं तुम्ही श्रेय कसं काय काढून घेऊ शकता", असं म्हणत राज ठाकरे यांनी शिवसेनेतील फुटीला उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचे सांगितलं.

राज ठाकरे म्हणाले, "बंडखोर आमदारांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप-प्रत्यारोप केले, त्यांच्यावर हल्लाबोल केला. पण शिवसेना फुटली याला संजय राऊत जबाबदार नाही, मी समजू शकतो ते सकाळी टीव्हीवर येतात,त्यांची ती स्टाईल, त्यांचा तो अहंकार, यामुळे माणसं वैतागली, राऊत रोज तेच तेच बोलतात, असे लोकही म्हणू लागले. पण ते तेवढ्यापूरतं होतं, राऊतांमुळे आमदार फुटले नाहीत, त्याचे श्रेय उद्धव ठाकरेंना आहे,"

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (शनिवारी) संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. फडणवीस हे राऊतांबाबत बोलत असताना सभागृहातील कार्यकर्त्यांकडून जोरजोरात घोषणा देण्यात आल्या. त्यावेळी फडणवीसांनी संजय राऊत यांचे आभार मानण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.

"राऊतांनी सतत भाजपवर टीका केली, त्यामुळे राज्यात सत्तात्तर झाले. राज्यात शिंदे सरकार येण्यामागे राऊतांचा मोठा वाटा आहे, सकाळी नऊ वाजता बोलणारे आता कमी बोलू लागले, त्याचे काय कारण आहे मला माहित नाही. तुम्ही त्यांना शिव्या देवू नका प्लीज. त्यांचे आभार माना. हे सरकार येण्यात त्यांचा जेवढा वाटा तेव्हा इतर कुणाचाच नाही," असा टोला फडणवीसांनी यावेळी राऊतांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT