IPS Transfer राज्यातील ४३ ‘आयपीएस’ अधिकाऱ्यांच्या गुरूवारी बदल्या करण्यात आल्या खऱ्या मात्र, त्यातील तीन पोलीस आधिक्षकांच्या बदल्यांना आज पुन्हा स्थगित देण्यात आली आहे. यवतवमाळ, सिंधुदूर्ग व हिंगोली तीन अधीक्षकांनी पुढील आदेशापर्यंत पदभार सोडू नये, असे सांगण्यात आले आहे.
गुरूवारच्या आदेशात औरंगाबादचे अपर पोलीस आधीक्षक पवन बनसोड यांची सिंधुदूर्गला अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली होती. संदीपसिंह गिल यांची समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक १२ ( हिंगोली) यांची हिंगोली येथेच अधीक्षक म्हणून तर नाशिक येथील पोलीस अकादमीचे अधीक्षक गौरव सिंह यांची यवतमाळचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली होती. या तीनही आधिकाऱ्यांच्या बदल्या आज स्थगिती देण्यात आली असून आधी तिथे असलेल्या आधिकाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत काम करण्यास सांगण्यात आले आहे.
गुरूवारच्या आदेशात औरंगाबादचे अपर पोलीस आधीक्षक पवन बनसोड यांची सिंधुदूर्गला अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली होती. संदीपसिंह गिल यांची समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक १२ ( हिंगोली) यांची हिंगोली येथेच अधीक्षक म्हणून तर नाशिक येथील पोलीस अकादमीचे अधीक्षक गौरव सिंह यांची यवतमाळचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली होती. या तीनही आधिकाऱ्यांच्या बदल्या आज स्थगिती देण्यात आली असून आधी तिथे असलेल्या आधिकाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत काम करण्यास सांगण्यात आले आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येंने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार अशा चर्चा सुरु होती. मात्र, अखेर गुरूवारी बदल्यांचा शासन निर्णय गृह विभागाकडून जारी करण्यात आला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.