Jaipur Mumbai Train Firing Sarkarnama
मुंबई

Jaipur Mumbai Train Firing : जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमधील गोळीबारात चार जणांचा जागीच मृत्यू

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये आज (सोमवारी) पहाटेच्या सुमारास अंदाधूंद गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. या गोळीबारात एका आरपीएफ जवानासह ४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

ही घटना दहिसर ते मीरारोड (Palghar) स्थानकादरम्यान घडली. चेतन सिंह असे आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबलचे नाव आहे. गोळीबारानंतर ही गाडी मुंबई सेंट्रल येथे थांबविण्यात आली होती.

जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेन गुजरातमधून महाराष्ट्रात दाखल झाली. ट्रेनने पालघर क्रॉस करताच मीरारोड ते दहिसरदरम्यान सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ट्रेनमध्ये गोळीबार झाला. घटनेची माहिती मिळतात जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली.

पालघरमध्ये ट्रेन आल्यावर B-5 डब्यात अचानक गोळीबाराचा आवाज झाला. आरपीएफ जवानानेच सहकाऱ्यासह प्रवाशांवर गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाजाने प्रवाशांची धावपळ झाली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

काही प्रवाशांसोबत चेतन सिंह याचा वाद झाला होता. यावेळी संतापलेल्या चेतन सिंहने प्रवाशांचे दिशेने बंदूक धरली. त्यावेळी सहकाऱ्याने त्याला थांबवण्याचा आणि शांत करण्याचा प्रयत्न केला. पण राग अनावर झाल्याने चेतन सिंह याने आरपीएफच्या कर्मचाऱ्यासह तीन प्रवाशांवर गोळीबार केला.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT