Jitendra Awhad , Raj Thackeray
Jitendra Awhad , Raj Thackeray sarkarnama
मुंबई

आव्हाडांचं राज ठाकरेंना खुलं आव्हान ; तर राजकारण सोडेन!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा जातीपातीचा मुद्दा उकरुन काढला. त्यांनी राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरे यांच्या भाषणातील विविध मुद्द्यांना टि्वट करीत प्रत्युत्तर दिलं आहे.

''राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शरद पवार (Sharad Pawar)यांना महाराष्ट्रात जातीयवाद हवा आहे. राष्ट्रवादीच्या जन्मापासून महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झालं आहे. राष्ट्रवादीने दुसऱ्या जातीचा द्वेष निर्माण करायला लावला. त्यामधून समाजात फूट पाडली जात आहे, असा घणाघात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शनिवारी गुढी पाडवा मेळाव्यात केला. (Jitendra Awhad criticism on Raj Thackeray)

राज ठाकरेंनी काल आपल्या भाषणात मदरशांमधील घडामोडींबद्दल प्रश्न उपस्थित केले. मदरशांमध्ये धाडी टाकाव्यात अशी विनंती त्यांनी पंतप्रधान मोदींकडे केली. या मुद्द्यावरून आव्हाडांनी राज ठाकरेंना टि्वट करुन खुलं आव्हान दिलं. "राज ठाकरे यांनी मुंब्र्याबद्दल कारण नसताना जातीयवादी विधान केलं.माझं राज यांना जाहीर आव्हान आहे की, त्यांनी माझ्यासोबत मुंब्र्यातील कोणत्याही मदरशात यावं. दाढीचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडून देईन. मुंब्र्यात काही शतकं हिंदू-मुसलमान प्रेमानं राहतात. मुंब्र्याला बदनाम करू नका."

आव्हाडांनी टि्वट करुन राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ''प्रबोधनकारांची पुस्तक वाचली तर जात पात समजेल आणि त्याचे जन्मदाते ही समजतील शरद पवार साहेबांचे नाव घेतले कि महाराष्ट्रात चर्चा होतेच ... हे गणित डोक्यात ठेऊन काही जण भाषण करतात,'' असा टोला आव्हाडांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

''जातीपातीचे राजकारण आपण कधी बंद करणार आहेत, झेंडा पाहून घ्या एकदा ..विषय संपला..नीळा, भगवा, हिरवा,'' असा प्रश्न आव्हाडांनी ठाकरेंना टि्वट करुन विचारला आहे. ''महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट ते मशिदीबाहेर भोंगे घेऊन पोरांना बसायला सांगणे, हा प्रवास आहे राज ठाकरे यांचा,'' अशा शब्दात आव्हाडांनी राज ठाकरेंना डिवचलं आहे.

शिवसेनेच्या नेत्या, माजी महापैार किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी राज ठाकरेच्या भाषणावर सडकून टीका केली आहे. पेडणेकर म्हणाल्या, ''राज ठाकरेंचे काल भाषण भाजपने लिहून दिले होतं. आम्हालाही लोकं विचारतात 'लाव रे तो व्हिडिओ,'' शिवसेनेचा द्वेष करण्यासाठी स्वतःचा पक्ष काढला का असा प्रश्न निर्माण होतो. कालच्या त्यांच्या भाषणाबाबत बऱ्याच मनसैनिकांनी आम्हाला सांगितलं की मोरी तुंबली आहे वाटलं, काही तरी निघेल पण भाजपचं गांडूळ निघालं''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT