Jitendra Awhad News
Jitendra Awhad News  Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad News: मोठी बातमी!राष्ट्रवादीत राजीनामा सत्र सुरुच; जितेंद्र आव्हाडांचा राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा

सरकारनामा ब्यूरो

Thane News: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील कार्यक्रमात सार्वजनिक जीवनात कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याचा निर्णय घेतला असल्याचं जाहीर केला. यामुळे त्यांच्या घोषणेमुळे राजकीय क्षेत्रात विशेषतः राष्ट्रवादी पक्षांतर्गत नेते व कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात मोठी खळबळ उडाली.

तसेच पवारांनी आपला राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती करत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत.यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी आपल्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे.

शरद पवार(Sharad Pawar), अजित पवार, जयंत पाटील यांनी पक्षातील पदाधिकारी, का्र्यकर्ते यांना राजीनामा न देण्याच्या केलेल्या आवाहनानंतर देखील हे राजीनामास्त्र अद्यापही थांबलेलं नाही. यातच आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस या पदाचा राजीनामा दिला आहे. याचवेळी ठाण्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा दिल्याचं समोर आलं आहे.

ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. जितेंद्र आव्हाड मुंबईतील बैठकीला देखील उपस्थित राहिलेले नाहीत. शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

यावेळी आव्हाड म्हणाले,शरद पवारांनी एवढा मोठा निर्णय़ घेताना आम्हांला विश्वासात का घेतलं नाही असा सवालही उपस्थित केला आहे.जर नवीन लोकांना संधी द्यायची असेल तर आम्हीही राजीनामे देतो, आमच्या जागीही नवीन लोकांना संधी द्या असंही आव्हाड यावेळी म्हणाले. तसेच पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांना अश्रू अनावर

शरद पवारांचा हा निर्णय ऐकून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. “आपण सर्वाचे अश्रू आणि भावनाही पाहत आहात. गेल्या ६० वर्षांच्या काळात कार्यकर्त्याच्या मनात काय चाललंय, हे बघणारे जादूगार आहात तुम्ही. वय हा तुमच्यासाठी प्रश्न नाही आहे. २००४ साली नागपूरमध्ये तोंडातून रक्त वाहत असताना आम्ही तुम्हाला प्रचार करताना पाहिलं आहे. आताची तब्येत तुलनेनं खूप बरी आहे. त्यामुळे तुम्ही हा राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

...ते सकारात्मकपणे विचार करतील

जितेंद्र आव्हाड म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात उद्यापासून तीव्र आंदोलनं सुरू होतील. लोक पवार साहेबांचंही ऐकायला तयार नाहीत. त्यांनी राजीनामा मागे घेतला पाहिजे, हीच त्यांची मागणी आहे. मी स्वतः ३५ ते ४० वर्ष राजकारणात आहे, त्यांचं बोट धरून पुढे आलो आहे. ते राजकारणात नसतील तर आम्ही तरी कशाला राहायचंय या राजकारणात. संपलं आमचं पण राजकारण हीच भावना अनेकांची आहे. शरद पवार हे लोकभावनेचा आदर करणारे, लोकशाही मानणारे नेते आहेत. ते लोकांच्या भावनेचा आदर करतील, ते सकारात्मकपणे विचार करतील आणि योग्य तो निर्णय घेतील.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT