Jitendra Awhad, Ajit Pawar, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad News : दोघे महाराष्ट्राचे दादा, युद्धात जिंकले, पण तहात हरले! आव्हाडांनी डिवचलं

Pankaj Rodekar

Thane News : महायुतीतील लोकसभेच्या जागावाटपावरून शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad News) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचलं. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांबद्दल मला वाईट वाटते. दोघे महाराष्ट्राचे दादा होते. लोकसभा तिकीट वाटपात जे शिंदेंचे झाले तेच दादांचे झाले आहे. दुसरीकडे शिंदे हे युद्ध जिंकले असे म्हणतात. पण, तुम्ही युद्धात जिंकलात, पण तहात हरला. हीच महाराष्ट्रातील वाईट गोष्ट असल्याचा टोला आव्हाडांनी लगावला आहे.

ठाण्यात मीडियाशी बोलताना आव्हाडांनी शुक्रवारी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर टीका केली. महाराष्ट्रातील (Maharashtra) नेते जागावाटपासाठी दिल्लीला जातात, असा प्रश्न विचारला असता शिंदे आणि अजितदादा (Ajit Pawar) या दोघांबद्दल मला हेच वाईट वाटते, असे म्हणत आव्हाडांनी टोला लगावला.

दोघे महाराष्ट्राचे दादा होते, तर महायुतीत जाण्यापूर्वी अजितदादा हे सिल्वर ओकवर चार-पाच जणांना बोलायचे, साहेबांबरोबर बसायचे आणि मिळालेल्या जागांवर तेथेच पेन घेऊन लिहून काढायचे. त्याच्यावर साहेबांची सही घेऊन यादी खिशात टाकत आणि ताट मानेने बाहेर पडायचे. आता तेथे त्यांना माहीत नाही. त्यांना कुठल्या जागा मिळाल्या आहेत. उमेदवार कुठला आहे, अशी टीका आव्हाडांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ज्या चार जागा जाहीर केल्या. त्यामध्ये एक जागा निवडून आलेला खासदार आणि एक स्वतःची पत्नी. बाकी भाजपने पाठवून दिलेले ही आमची माणसे आहेत, असा टोलाही आव्हाडांनी लगावला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितल्याशिवाय मातोश्रीवर पान हलत नव्हते. त्यांची एवढी पकड होती. पण महायुतीत हेमंत गोडसे यांना दिलेले तिकीट काढून घेतले यावरून बंडामध्ये आपल्या सोबत होते, त्यांचे जीव वाचवण्याचे काम करायला पाहिजे होते, असे आव्हाड म्हणाले.

युद्धात साथीदाराला एकटे सोडायचे नसते, त्याला बरोबर आणायचे असते, अशी टीका शिंदे यांच्यावर आव्हाडांनी केली. तसेच युद्ध जिंकले असे म्हणता पण युद्धात जिंकलात, पण तहात हरलात, हीच महाराष्ट्रातील वाईट गोष्ट आहे, असे सांगत आव्हाडांनी निशाणा साधला.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT