Vidhan Bhavan Mumbai, Maharashtra Political Crisis  Sarkarnama
मुंबई

Maharashtra Monsoon Session :शिंदे-फडणवीस-पवारांना विरोधक 'सळो की पळो करुन सोडणार' ; अधिवेशनात हे मुद्दे गाजणार

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : राज्याचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून (सोमवार) सुरू होत आहे. सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधकांनी तयारी केली आहे. सध्या विरोधकांच्या बैठका सुरु आहेत. तर दुसरीकडे विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मंत्री तयारी करीत आहेत.

"उद्या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना विविध मुद्यांवर धारेवर धरुन त्यांना 'सळो की पळो' करुन सोडणार," असा इशारा विरोधीपक्षनेते अंबादान दानवे यांनी दिला रविवारी दिला. विरोधी पक्षनेता कोण होणार याबाबत महाविकास आघाडीमध्ये विचारविनिमय सुरु आहे. या पदावर काँग्रेसने दावा केला आहे. याबाबत आघाडीची बैठक सुरु आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार यांनाच सत्तेत सहभागी करून घेतले आहे. त्यामुळे या पावसाळी अधिवेशनात कुठल्या मुद्यांवर चर्चा होणार, कोण विरोध करणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

गेल्या अधिवेशनात विरोधी बाकांवर बसणारे राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ नेते उद्यापासून सुरु होणाऱ्या अधिवेनात सत्ताधारी बाकांवर बसणार आहेत. गेल्या अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारवर

तुटून पडणारे अजित पवार यावेळी सत्तेत आहेत. त्यामुळे अधिवेशनात विरोधकांचा आवाज कमी झालाची चर्चा आहे.

अधिवेशनात हे मुद्दे गाजणार..

  • समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात

  • अब्दुल सत्तार, संजय राठोड यांच्या कार्यालयातील गैरव्यवहार,

  • राज्यातील कोयत्या गॅगची दहशत

  • महिला अत्याचाऱ्यांच्या घटनांमध्ये झालेली वाढ

  • शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंड

  • राज्यात पावसाने दिलेली ओढ, दुबार पेरणी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT