Mumbai Police Sarkarnama
मुंबई

Mumbai Police: धक्कादायक! चार वर्षांत 427 पोलिसांचा अकाली मृत्यू; 25 जणांनी जीवन संपवलं; 75 पोलिसांचा ह्दयविकाराने मृत्यू

Maharashtra Police Deaths Heart Attacks: 40 वर्षांवरील पोलिसांची वर्षातून एकदा आणि 50 वर्षांवरील पोलिसांची वर्षातून दोनदा आरोग्य तपासणी करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. ४० प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार केले जात आहेत.

Mangesh Mahale

Mumbai News: लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांनंतर (स्कॉटलंड यार्ड) मुंबई पोलिस हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे पोलिस दल मानले जाते. पण या मुंबई पोलिसांबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या चार वर्षात 427 पोलिसांचा अकाली मृत्यू झाला आहे. तर 75 पोलिसांचा ह्दयविकाराच्या धक्काने निधन झाले आहे. विविध कारणांमुळे 25 पोलिसांनी आत्महत्या केली आहे, तर कॅन्सरमुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यात एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. या प्रकरणात मृतांच्या नातेवाईकांनी कुठलीही तक्रार न केल्याने याची कारणे शोधण्यासाठी तपास करण्यात आलेला नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.

पोलिस दलात अनुकंपा तत्वावरील भरतीची प्रक्रिया सुरु करणार असून या 150 दिवसाच्या मोहीमेत हा प्रश्न सोडवण्यात येणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. याबाबत शिवसेनेचे सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत प्रश्न विचारला होता.

मुंबईत पोलिसांसाठी ८ तास ड्युटीची संकल्पना सुरु आहे. काही वेळा सणासुदीच्या किंवा बंदोबस्तात पोलिसांना अधिक काळ ड्युटी करावी लागते, मात्र पोलिसांची ८ तासांची ड्युटी आता स्थिर झाली आहे. पोलिसांना साप्ताहिक सुट्टी देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

40 वर्षांवरील पोलिसांची वर्षातून एकदा आणि 50 वर्षांवरील पोलिसांची वर्षातून दोनदा आरोग्य तपासणी करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. ४० प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार केले जात आहेत. त्यासाठी राज्यातील २७० रुग्णालयांशी करार करण्यात आला आहे. टाटा मेमोरियल आणि ए. के. मेहता हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सर तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येते, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

अंमली पदार्थ तस्करांविरोधात कडक कायदा करण्याचा विचार महाराष्ट्र सरकार करत आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) अमली पदार्थ विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यासाठी राज्य सरकार सध्याच्या कायद्यात सुधारणा करणार आहे. राज्य विधिमंडळाच्या चालू पावसाळी अधिवेशनात ही दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT