Maharashtra Political Crisis :  Sarkarnama
मुंबई

Maharashtra Political Crisis : अजित पवारांकडून जिल्हाध्यक्षांची जुळवाजुळव सुरू? कैलास पाटील नॉट रिचेबल..

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) केलेल्या बंड उगारल्यानंतर आता राष्ट्रवादी पक्षाचे दोन गट पडले असल्याचे दिसून येत आहे. अजित पवार विरूद्ध शरद पवार (Sharad Pawar) असा सामना पाहायला मिळत आहे. यामुळे आता दोन्ही गटाकडून राष्ट्रवादी पक्ष आमचाच असा दावा होण्याची चिन्हे आहेत. (Latest Marathi News)

पक्षावर दावा करण्यासाठी दोन्ही गटाकडून आमदार आणि पदाधिकाऱ्यांची जुळवाजुळव सुरू आहे. अजित पवारांकडून आता सर्वप्रथम पक्षाच्या जिल्ह्याध्यक्षांची जमवाजमव सुरू असल्याचे दिसून येत आहे. आता याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे, छत्रपती संभाजीनगरचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील हे सध्या 'नॉट रिचेबल' असल्याची माहिती मिळत आहे. पाटील हे नॉट रिचेबल असल्यामुळे ते अजित पवारांच्या गटात जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शरथ घेतल्यानंतर शरद पवार मुंबईत दाखल झाले आहेत. काल रात्री सिल्वर ओकवर नामांकीत वकील दाखल झाले होते. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून नव्या नियुक्त्या आणि बडतर्फीचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. यामुळे आता मोठा कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. यामुळेच आता शरद पवार यांनी कायदेशीर चाचपणीला सुरूवात केल्याची चर्चा आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT