Mumbai News, 15 Jun : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहेत.
हे दोन्ही भाऊ एकत्र आल्यास त्याचा राज्याच्या राजकारणावर मोठा परिणाम होईल असंही बोललं जात आहे. अशातच आता राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत 54 टक्के मते या दोघांना मिळतील असा सर्व्हे समोर आला आहे.
त्यामुळेच भाजप घाबरली असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. नुकतंच दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. तर एकनाथ शिंदेंचे मंत्री उदय सामंत यांनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली होती.
याच सर्व भेटीवर आणि ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "दोन्ही भाऊ एकत्र येण्याबाबत आम्ही आशावादी आहोत. पण, भाजप दोन भाऊ, दोन पक्ष एकत्र येऊ नयेत यासाठी प्रयत्न करत आहे.
मात्र, ठाकरे बंधू एकत्र आल्यास महापालिकेच्या निवडणुकीत 54 टक्के मते या दोन्ही भावांना मिळतील अशा पद्धतीचा सर्व्हे आल्यामुळे भाजप घाबरलेली आहे." दरम्यान यावेळी त्यांनी शरद पवारांची राष्ट्रवादीमध्ये भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना भाजपवर हल्लाबोल केला.
विरोधी पक्षाच्या आमदार, खासदारांबाबत अफवा पसरवून भाजपबद्दल लोकांचे प्रेम किती वाढलं आहे, असा आभास निर्माण करण्याचा रोग भाजपला लागला आहे, असंही ते यावेळी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.