Manoj Jarange Maratha Morcha :  Sarkarnama
मुंबई

Manoj Jarange Speech on Maratha Reservation : मनोज जरांगे म्हणाले, गैरसमज होऊ देऊ नका...

Roshan More

Mumbai : अंतरवाली सराटीहून निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठीचा महाविराट मोर्चा मुंबईजवळच्या वाशीमध्ये मुक्कामासाठी थांबला होता. त्यावेळी मुंबईत प्रवेश करण्याआधी राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांना भेटले. शिष्टमंडळासोबत झालेली चर्चा सांगण्यासाठी मनोज जरांगे पाटील वाशीमधील शिवाजी महाराज चौकातील सभास्थळी पोहचले. मात्र, साऊंडचा आवाज येत नसल्याने पुन्हा दोन वाजता सभा घेणार असल्याचे जरांगे पाटील यांनी जाहीर केले.

गैरसमज होऊ देऊ नका. झालेली चर्चा सगळ्यांना समजली पाहिजे, असे सांगत जरांगे पाटील यांनी सभेसाठी आलेल्या मराठा बांधवांना आवाज जात नसल्याने भाषण केले नाही. एका तासात साऊंड सिस्टीमची व्यवस्था होईल. त्यानंतर बरोबर दोन वाजता पुन्हा सभेला संबोधित करू,असे जरांगे पाटील यांनी जाहीर केले. Manoj Jarange Speech on Maratha Reservation

आपण सकाळी 11 पासूनच उपोषणाला सुरुवात केले आहे. सरकारने आपल्याला काही कागदपत्र दिली आहेत. आता आपण मोकळ्या हाताने परत जात नाही. झालेली चर्चा समाजाच्या कानावर घालायाची आहे, असे म्हणत जरांगे यांनी सांगितले. मात्र, त्यांचा आवाज सभेसाठी उपस्थित असलेल्या सगळ्या मराठा बांधवा पर्यंत पोहचत नव्हता. त्यामुळे आवाज येत नाही, अशी तक्रार सभास्थळी असणाऱ्या मराठा बांधवांकडून करण्यात येत होती.

मनोज जरांगे पाटील सर्वांना आवाज पोहचतो आहे का याची याची विचारणा केली. मात्र, आवाज येत नाही, असे सभास्थळी असणाऱ्या नागरिकांनी सांगितले. त्यामुळे सभा दोन वाजता सुरु होणार असल्याचे जरांगे यांनी जाहीर केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT