Nitesh Rane News
Nitesh Rane News sarkarnama
मुंबई

राणेंना अटक झाल्याशिवाय जामीन मिळणे शक्य नाही! अनिल परबांचं वकिली भाषेत उत्तर

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) अडचणीत आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने राणेंचा जामीन फेटाळला आहे. जामीन फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात जाण्याचे संकेत त्यांच्या वकिलांनी दिले आहे. यावर शिवसेना नेते परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी वकिली भाषेत उत्तर दिले आहे. राणेंना अटक झाल्याशिवाय जामीन मिळणार नाही, असे परब यांनी म्हटले आहे.

न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी राणेंचा जामीन अर्ज फेटाळला. पोलिसांच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी बाजू मांडली होती. न्यायालयाने राणेेंचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे त्यांना अटक होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांना अटक करायची की नाही, असा पेच पोलिसांसमोर आहे. कारण त्यांना सर्वोच्च न्यायालयाने शरण येण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी दिला आहे. त्यामुळे या कालावधीत अटक करायची की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे (Satish Maneshinde) हे राणेंच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. राणेंना अटक होऊ शकत नाही, असे त्यांचे वकील म्हणत आहेत. यावर बोलताना अनिल परब म्हणाले की, राणेंनी शरणागतीचा अर्ज केलेला नाही. ते शरण येत नाही तोपर्यंत जामीन अर्जासाठी पात्र ठरत नाही. त्यांना अटक होत नाही तोपर्यंत जामीन होत नाही. म्हणून न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. ते आता उच्च न्यायालयात जाणार असले तरी आधी त्यांना शरण जावे लागेल

सिंधुदुर्ग न्यायालयासमोर आज मोठ्या घडामोडी घडल्या. आमदार नितेश राणे हे सुनावणीसाठी जिल्हा न्यायालयासमोर हजर झाले. जामीन फेटाळला गेल्यानंतर राणे न्यायालयातून निघत असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. यानंतर नितेश राणे आणि त्यांचे बंधू निलेश राणे यांनी पोलिसांना गाडी अडवण्याचे कारण विचारले.त्यावेळी त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरवात केली. मला कायदा शिकवू नका, असे म्हणत त्यांनी पोलिसांशी बाचाबाची केली. त्यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आल्याने तणाव निर्माण झाला आहे. यानंतर राणे बंधू थेट वकिलांसमवेत पुन्हा न्यायालयात गेले. नितेश राणे आता जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज करणार आहेत.

नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास सर्वोच्च न्यायालयाने 10 दिवसांचा अवधी दिला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर 24 तासांतच नितेश राणे जिल्हा न्यायालयासमोर शरण आले होते. त्यांनी शरण येण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. मागील सुमारे महिनाभरापासून नितेश राणे गायब होते. ते नुकतेच प्रकटले असून, ते मागील काही दिवस कणकवली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावत होते. (Nitesh Rane bail hearing)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT