Ajit Pawar Uddhav thackray and Nana Patole
Ajit Pawar Uddhav thackray and Nana Patole  sarkarnama
मुंबई

शिवसेना-राष्ट्रवादीची सोयीने प्रभाग रचना; काँग्रेस कोर्टात जाणार : नाना पटोलेंचा इशारा

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भंडारा-गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीतील वादानंतर महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आपल्या सोयीने प्रभाग रचना करत आहेत असा आरोप करत काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आपल्याच सरकारविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. तसेच मुंबईतल्या प्रभाग पुनर्रचनेबद्दलही नाना पटोले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नाना पटोलेंचा आता शिवसेनेशी पंगा

मुंबईतील प्रभाग पुनर्रचनेबद्दल नाना पटोले (Nana Patole) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, तीन पक्षांचं सरकार आहे, तेव्हा सगळ्या पक्षांचं मत विचारात घेऊन वॉर्ड रचना व्हायला हवी. सोबत राहून आपल्या मित्राचंच नुकसान होत असेल तर ते बरोबर नाही. आमच्या स्थानिक प्रतिनिधींनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

आम्ही अनेक ठिकाणी कोर्टात गेलो आहोत. ज्याप्रमाणे प्रभागरचना होत आहे. आमची मागणी दोनच्या प्रभागाची होती, पण तीनचा प्रभाग करण्यात आला. मुंबईत असेल, पुण्यात असेल, मविआतले काही पक्ष आपल्या सोयीने प्रभाग पाडत आहेत. तसं असेल तर आम्ही कोर्टात जाणार आहोत, असा इशाराही पटोले यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे.

नाना पटोले यांनी शिवसेना सत्ताधारी असलेल्या मुंबई महापालिकेच्या कारभारावर देखील टीका केली आहे. शिवसेनेवर (Shivsena) टीका करताना ते म्हणतात, "दरवर्षी पावसात मुंबई पाण्याखाली जाते. काँग्रेसचाही अनेक वर्ष मुंबईमध्ये महापौर होता. पण तेव्हा कधी मुंबई बुडली नाही. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई सतत पाण्यात आहे".

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT