Narayan Rane Latest Marathi News, Eknath Shinde Latest Marathi News
Narayan Rane Latest Marathi News, Eknath Shinde Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

मी आणि मुख्यमंत्री शिंदे निष्ठावान शिवसैनिक, त्यांनी दसरा मेळावा घ्यावा...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : यावर्षी गणेश चतुर्थीच्या आधीच राज्यात सत्तांतर झाले आहे. गेल्या अडीच वर्षापासून राज्यवर असलेलं संकट टळलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात आमचं सरकार आलं आहे. मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निष्ठावान शिवसैनिक असल्याने आमच्यात बोलणं व्हायच, मात्र ते स्वतःच्या कर्तुत्वावर मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांनी यंदा दसरा मेळावा घ्यावा आणि मला त्या मेळाव्याला बोलावलं तर मी नक्की जाईल,असे मत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी आज गणरायाच्या आगमना निमित्त 'सरकारनामा'शी खास संवाद साधला. (Narayan Rane, Eknath Shinde Latest Marathi News)

गणरायाचे आमच्या घरी आगमन झाल्याने आम्ही आनंदी आहोत. गणरायाने आम्हाला भरभरून दिल आहे. यावर्षी गणेश चतुर्थीच्या आधीच राज्यात सत्तांतर झाल्याने गेल्या अडीच वर्षापासून राज्यावर असलेलं संकट टळलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील आमचं सरकार आलं आहे. गणरायाकडे काही मागाव असं काही उरलं नाही. त्यांनी आम्हाला खुप काही दिल आहे,अशी प्रतिक्रिया राणे यांनी दिली.

महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीवर बोलतांना त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, गेल्या दीड वर्षात राज्यात कायदा सुव्यवस्था नव्हता याबरोबर कुठलाही विकास झाला नसून कोणत्याही क्षेत्रात ते काम करू शकले नाही. अशी टीका त्यांनी केली. याचबरोबर राज्यात सुशांत सिंग सारख्या कलावंताची हत्या झाली. दिशा सालीयनची अत्याचार करून हत्या झाली त्यांच्यावर अन्याय झाला आहे. यामुळे आम्ही वारंवार हा प्रश्न उपस्थित करत आहे. त्यांच्या हत्येपाठीमागे तत्कालीन सरकारमधील काही लोकांचा हात असल्याचा आरोपही राणेंनी केला.

उद्धव ठाकरेंच्या कामाचा विश्लेषण कराव असं काहीच नाही राज्याचे गेल्या अडीच वर्षात उत्पन्न किंवा जी.डी.पी वाढला नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. मराठी माणसांना नोकऱ्या मिळाल्या नाही. ठाकरे यांच्या सरकार निष्क्रिय सरकार होत. मी महाराष्ट्राच्या इतिहासात असं सरकार कधीच बघितलं नव्हतं,असा टोला देखील त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. तर मुख्यमंत्री म्हणून सांगायचं झाल्यास, असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले नाही आणि परत कधी मिळूही नये. ते तीन तासापेक्षा जास्त वेळ ते मंत्रालयात ना कॅबिनेट न सभागृहात दिसत होते. असला मुख्यमंत्री काय कामाचा त्यांनी आता गप्प बसावं बढाया मारू नये, अशा शब्दात राणे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

शिवसेना घडवायला बाळासाहेबांना 48 वर्षे लागले आणि या माणसाने अडीच वर्षात शिवसेना संपून टाकली, रसातळाला नेली. एकनाथ शिंदे माझ्यापेक्षा ज्युनिअर आहेत. मात्र तेही निष्ठावंत मीही निष्ठावंत शिवसैनिक असल्याने आमच बोलणं व्हायच. मात्र ते स्वतःच्या कर्तुत्वावर मुख्यमंत्री झाले आहेत. काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून वाद सुरू आहे. याबद्दल राणेंना विचारले असता ते म्हणाले की, शिवसेनेच्या जन्मापासून आतापर्यंत दसरा मेळावा झालेला आहे. आणि मीही त्या मेळाव्याला उपस्थित होतो. तेव्हा बाळासाहेबांचं विचाराचं सोनं लुटण्यासाठी हजारो शिवसैनिक त्या ठिकाणी यायचे. मात्र आता तसं काही विचारात राहिल नाही. यामुळे उद्धव ठाकरेंचे विचार कुणाला घ्यायचे नाहीत. त्यांनी उध्वस्त महाराष्ट्र करण्याचं काम केलं आहे, अशी जळजळीत टीकाही राणेंनी केली.

एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावा घ्यावा का? या प्रश्नावर बोलताना राणे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावा जरूर घ्यावा. महाराष्ट्राला दिशा कोणती देणार, कुठल्या दिशेला घेऊन जाणार हे त्यांनी महाराष्ट्राला सांगावं. त्यांनी मला निमंत्रण दिले तर मी त्यांच्या दसरा मेळाव्याला जाईल आणि जुना शिवसैनिक कसा असतो त्याचा प्रत्यय नवीन शिवसैनिकांना घडवून आणेल, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT