devendra fadavnis, Eknath khadse
devendra fadavnis, Eknath khadse sarkarnama
मुंबई

Eknath khadse : खडसेंनी फडणवीसांना करुन दिली 'त्या' भीष्म प्रतिज्ञेची आठवण

सरकारनामा ब्युरो

Eknath khadse : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काल (बुधवारी) अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. एकनाथ खडसे यांनी वेगळा विदर्भ या विषयावर भाष्य केले. खडसे यांनी यावेळी फडणवीसांना सल्ला दिला. पोलिसांच्या बदल्यावरुनही खडसेंनी फडणवीसांना चिमटा काढला. ( Eknath khadse latest news)

"देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले आहेत. आता ते उपमुख्यमंत्री आहेत. ते विर्दभातले आहेत. स्वतंत्र विर्दभासाठी ते आग्रही होते. विर्दभ वेगळा होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, अशी भीष्म प्रतिज्ञा फडणवीस यांनी घेतली होती. मात्र त्यांचे लग्न झाले. मुलगी झाली. मुलगी आता मोठी झाली. त्यांचा सुखाचा संसार सुरु आहे," असा शब्दात खडसे यांनी फडणवीस यांची खिल्ली उडवली.

"विर्दभ वेगळा करावा, अशी मागणी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी करण्यात आली. विर्दभाची जनता स्वतंत्र होण्यासाठी आंदोलन का करते याचा विचार करायला हवा. ही चुक एकट्या या सरकारची नाही. पण याचा विचार करण्याची आवश्यकता आहे," असा सल्ला खडसे यांनी फडणवीसांना दिला.

"मुंबई, ठाण्याच्या विकासासाठी सुमारे ४५ हजार कोटी रुपयांचे कर्ज शिंदे-फडणवीस सरकारने घेतले. केवळ मुंबई, ठाण्याचाच विकास करायचा आहे का?. या दोन्हा शहरांचा विकास झालाच पाहिजे. मात्र विर्दभाचा अनुषेश भरुन काढण्यासाठी काय तरतुद करण्यात आली," असा सवाल खडसेंनी यांनी यावेळी उपस्थित केला.

"पोलिसांच्या बदल्याचा आदेश निघतो, दुसऱ्या दिवशी त्याला स्थगिती मिळते, गृहमंत्रालयात हे काय सुरु आहे," असा सवाल खडसेंनी फडणवीसांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT