Nitin Gadkari, Avinash Jadhav News Sarkarnama
मुंबई

Anand Paranjpe News : जाधवांना नाटकीय आंदोलनाची सवयच; परांजपेंची खोचक टीका

राहुल क्षीरसागर

Thane News : ठाणेकरांचा हा प्रश्न सोडवायचा असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन मार्ग काढावा, अशाप्रकारे मनसैनिकांना उन्हातान्हात उभे करून प्रश्न सुटणार नाही, त्यांना उन्हातान्हात उभे करण्याचे नाटकीय आंदोलन करण्याची मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना सवय असल्याची खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) महाराष्ट्र प्रवक्ते, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी लगावला.

अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ठाणे टोलप्रश्नी आंदोलन होत आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण जाधव यांना एवढीच विनंती आहे की, मनसैनिकांना उन्हातान्हात उभे करण्यापेक्षा ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन गेले असते आणि टोल प्रश्नावर मार्ग काढला असता तर ते अधिक चांगले झाले असते, असेही ते म्हणाले.

राज ठाकरे यांचे या सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. उन्हातान्हात मनसेच्या कार्यकर्त्यांंना उभे करून हा प्रश्न सुटणार नाही. गुजरातमध्ये जा, मध्य प्रदेशात जा तिथे टोल आहे. जाधव यांना नेहमीच नाटकीय आंदोलन करण्याची सवय असल्याचा जोरदार हल्लाबोल परांजपे यांनी या वेळी केला. या प्रसंगी ठाणे राष्ट्रवादी सरचिटणीस रवींद्र पालव, विधानसभा अध्यक्ष नितीन पाटील, ब्लॉक अध्यक्ष नीलेश फडतरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT