Eknath Khadse Latest News
Eknath Khadse Latest News Sarkarnama
मुंबई

वाडवडिलांनी जे कमावलं ते मुलांनी एका मिनिटात घालवलं : एकनाथ खडसे

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : आयुष्यभर सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जी मेहनत केली आणि धनुष्यबाणाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्यांची वर्षानुवर्षाची पुण्याई दोघांच्या भांडणामध्ये गोठवली गेली. मला वाटत यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा. वाडवडीलांनी आयुष्यभर जे कमावलं ते एका मिनिटांमध्ये मुलांनी घालवले. त्याला कोण जबाबदार आहे, कोण नाही हे निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यावर समजेल. परंतु तात्पुरता का होईना निवडणूक चिन्ह गोठवलं हे अत्यंत दुःखदायक क्लेशदायक गोष्ट आहे,अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Shinde) यांनी डोंबिवली येथे व्यक्त केली.

विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे आणि काँग्रेस आमदार शिरीष चौधरी हे डोंबिवलीतील आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Eknath Khadse Latest News)

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवले आहे. त्याबद्दल खडसे यांनी आपले मत मांडले, ते म्हणाले, सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जी मेहनत केली आणि धनुष्यबाणाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. ज्या धनुष्यबाणाच्या जोरावर या महाराष्ट्रात अनेक सत्ता केंद्रावर शिवसेनेने सत्ता काबीज केली. महाराष्ट्र सरकार मध्ये मुख्यमंत्री म्हणून ही त्यांचे मुख्यमंत्री झाले आणि वर्षानुवर्षाची जी पुण्याई होती ती दोघांच्या भांडणामध्ये गोठवली गेली. मला वाटत यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा. वाडवडीलानी आयुष्यभर जे कमावलं ते एका मिनिटांमध्ये मुलांनी घालवलं.

त्याला कोण जबाबदार आहे. कोण नाही हे निवडणूक आयोगाचा निर्णय आला तर समजेल मात्र निवडणूक चिन्ह तात्पुरता का होईना गोठवलं हे अत्यंत दुःखदायक क्लेशदायक गोष्ट आहे, असेही खडसे म्हणाले.

रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात क्लिन चिट मिळाली आहे, यावर खडसे म्हणाले, या केसच भवितव्य आता अंधारात आहे. रश्मी शुक्ला ज्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या त्याच दिवशी रश्मी शुक्लाना क्लिन चिट मिळेल, अस वाटलं होतं. फोन टॅपिंगसाठी मदत करत असताना त्या ठिकाणी त्या प्रमुख होत्या. माझा ही फोन 68 दिवस टॅप करण्यात आला. कोणत्या कारणासाठी माझा फोन टॅप करण्यात आला. याची मला अजूनही कल्पना देण्यात आलेली नाही. एफआयआर दाखल झालेला आहे. चौकशी सुरू आहे असं सांगण्यात येत. रश्मी शुक्ला त्या कालखंडात प्रमुख होत्या म्हणून त्यांना जबाबदार धरण्यात आलं होतं. आता त्यांना क्लिन चिट दिली आहे , त्यामुळे या केसच भवितव्य आता अंधारात आहे.

काँगेसचे रावेर येथील आमदार शिरीष चौधरी हे निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवले आहे त्यावर आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की, केंद्राच्या यंत्रणांनी कायदा नियम आणि घटनेचा चोळामोळा करायचे ठरवलेच आहे, तर काय बोलायचं. एवढेच मला एक सामान्य माणूस म्हणून वाटते. राजकीय व्यक्ती म्हणून नाही. या देशाची घटना, स्वायत्त यंत्रणा देखील चोळामोळा करून पायाखाली रगडायची आहे. हे काम जर चाललेल असेल तर देशाच्या जनतेने याचा विचार करावा, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT