Mumbai News : विधानसभा निवडणुकीत महायुतील घवघवीत यश मिळालं. यानंतर सरकार स्थापन झाले. मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीने मात्र विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाचे खापर 'ईव्हीएम'वर फोडले आहे. यातच काही ठिकाणी 'ईव्हीएम' मशीनविरोधात आंदोलन सुरू झाले आहे.
यातून मारकडवाडी गावात याची पहिली ठिणगी पडली. ग्रामस्थांनी तिथं आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला शरद पवार यांनी भेट दिली. त्यानंतर महायुतीमधील भाजप नेत्यांनी इथं सभा घेतली. या सभेत शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली. पवारसाहेबांवर झालेल्या टीकेवरून सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पवारसाहेबांवर टीका करणाऱ्यांना चांगलेच सुनावलं आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर मारकडवाडीत भाजप (BJP) नेत्यांनी वैयक्तिक टीका केली होती. भाजप आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी टीका खालच्या पातळीवर होती. यावर सत्ताधारी आणि विरोधकांकडून संतप्त, अशा प्रतिक्रिया उमटल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर समज दिली जाईल, असा इशारा दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पवारसाहेबांवर टीका करणाऱ्यांना चांगलेच सुनावलं. यासाठी त्यांनी राज्यसभेत सभापती उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना केलेल्या भाषणाचा दाखला दिला. तशी पोस्ट आणि व्हिडिओ त्यांनी त्यांच्या एक्स खात्यावर शेअर केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "पवारसाहेबांचं कर्तृत्व संक्षेपात सांगताना, लोकसभा सभापती उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना यांना तब्बल 3 मिनिट लागली. भारताच्या विकासात आणि प्रगतीत महाराष्ट्राच्या या सह्याद्रीचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा आलेखच इतका मोठा आहे की, त्याचा आवाका बैलबुद्धीच्या लोकांच्या लक्षात देखील येणार नाही, असा विरोधकांना टोला लगावला".
"आपल्या "राजकीय आकांना" खुश करण्यासाठी काही कुंठित आणि मंद बुद्धीचे लोक साहेबांवर विकृत टीका करतात. मला असं वाटत की, यांना पोलिओचे डोस, या वयात देखील पाजण्याची गरज आहे. माझं या लोकांना इतकंच सांगन आहे की, लोकशाहीत टीका करण्याचा तुम्हाला नक्की अधिकार आहे. पण ही टीका करताना आपण त्याच लोकशाहीला अपेक्षित असणारे संकेत पाळले देखील अपेक्षित आहे. यातून आदरणीय साहेबांचं काही जात नाही. मात्र तुमच्या समजेवर, आकलन क्षमतेवर, तुमच्या बुद्धीवर जनतेत प्रश्न निर्माण होतात!", असा सल्ला देखील जितेंद्र आव्हाड यांनी टीकाकारांचे नाव न घेता दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.